शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

पीएमपीचे सारथ्य बेशिस्त हातात

By admin | Updated: January 3, 2017 06:36 IST

दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या पुणे महागनर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सारथ्य बेशिस्त हातात असल्याचे चित्र आहे.

पुणे : दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या पुणे महागनर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सारथ्य बेशिस्त हातात असल्याचे चित्र आहे. चालक व वाहकांकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळत नसल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडताना दिसत आहे. पीएमपी प्रशासनाकडून दंडात्मक, निलंबनाची कारवाई करून बेशिस्तीला आळा बसताना दिसत नाही.बसमधील आसनाला धडकल्याने जखमी झालेल्या प्रवाशाला चालक व वाहकाने रस्त्यातच सोडून पळ काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना दि. २६ डिसेंबर रोजी चऱ्होली रस्त्यावर घडली आहे. ज्ञानेश्वर रघुनाथ अभंग (वय ५७, रा. चऱ्होली) असे प्रवाशाचे नाव असून, त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात बसचालक राजकुमार श्रीधर चौधरी व वाहक काळुराम गंगाराम काळजे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराप्रमाणेच पीएमपी बसचालक व वाहकांविषयी प्रवाशांच्या विविध तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत असतात. दर महिन्याला साधारणपणे दीड हजार तक्रारींची नोंद तक्रार विभागात होत आहे. त्यामध्ये चालकांविषयीच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर यातील अनेक चालक हे ठेकेदारांच्या बसवरील आहेत. यावर्षी जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांत सुमारे साडेसहा हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. त्यामध्ये प्रवाशांनी हात दाखवूनही चालकाने बस न थांबविल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. हे प्रमाण १२०० हून अधिक आहे. त्यापाठोपाठ प्रवाशांशी उद्धट वर्तन, वाहतुकीचे नियम न पाळणे, बस स्थानकालगत उभी न करता रस्त्याच्या मधोमध उभी करणे, भरधाव वेगाने बस चालविणे, बस चालवत असताना मोबाईलवर बोलणे, प्रवास बसमध्ये चढण्याआधी बस सुरू करणे यांसह विविध तक्रारींचा समावेश आहे. अनेक प्रवाशांकडून तक्रारी केल्याही जात नाहीत. ठराविक प्रवाशांकडूनच तक्रारी केल्या जातात. त्यामुळे प्रत्यक्षात तक्रारींचा आकडा खूप मोठा असू शकतो. तक्रारींवर पीएमपी प्रशासनाकडून कार्यवाही करून चालक व वाहकांवर दंडात्मक, निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही तक्रारी कमी झालेल्या दिसत नाही. (प्रतिनिधी)