शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

पीएमपीएमएल विभाजनाच्या मार्गावर

By admin | Updated: December 13, 2015 02:54 IST

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला चांगल्या दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७ मध्ये स्थापन करण्यात

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला चांगल्या दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या विभाजनाबाबत आलेल्या मागणीनुसार, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेस पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी आपला आभिप्राय तातडीने पाठविण्याच्या सूचना नगर विकास विभागाने केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र नुकतेच पाठविण्यात आले असून अद्याप एकाही प्रशासनाने आपला अभिप्राय दिला नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही शहरांची वाहतूक व्यवस्था एकच असावी या उद्देशाने १९ आॅक्टोबर २००७ मध्ये पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली आहे. त्यात तत्कालीन पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण करण्यात आले. या वेळी या दोन्ही संस्था तोट्यात होत्या, तसेच त्यांची संपूर्ण आर्थिक जबाबदारी महापालिकेकडे होती. त्यानंतर ही कंपनी स्थापन झाल्यानंतर दोन्ही महापालिकांनी पहिली तीन वर्षे या कंपनीला आर्थिक मदत देण्याची तरतूद राज्यशासनाने केली होती. मात्र, या कंपनीच्या स्थापनेनंतर गेल्या सात वर्षांत ही कंपनी सातत्याने तोट्यातच असून पहिल्या वर्षी २७ कोटी असलेली कंपनीची संचलन तूट २०१४-१५ मध्ये १६७ कोटींच्या घरात पोहचली आहे. दरम्यान, या कंपनीचा वाढणाऱ्या तोट्यामुळे तसेच व्यवस्थापनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे दोन्ही महापालिकांच्या प्रतिनिधींकडून तसेच आमदार आणि खासदारांकडून हे विलगीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, तत्कालीन आमदार विलास लांडे, आमदार भीमराव तापकीर, लक्ष्मण रूपनार तसेच पीएमटी कामगार संघाचे महासचिव नरूद्दीन इनामदार यांनी पत्राद्वारे विलिनीकरण रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, राज्यशासनाकडून पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकांकडे तातडीने अभिप्राय मागविला आहे. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकक्षेत असल्याने त्याबाबत तातडीने अभिप्राय देण्याच्या सूचना राज्यशासनाकडून या तिन्ही घटकांना करण्यात आलेल्या आहेत.प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष या बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून या बाबत काय अभिप्राय सादर केला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पूर्वीही विभाजानाच्या मागणी वेळी प्रशासनाकडून विभाजन करू नये, अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. मात्र, पीएमपीएमएलची सध्याची स्थिती, गेल्या काही वर्षांत वाढत असलेला तोटा तसेच विभाजनाची वाढत असलेली मागणी या वरून आपला निर्णय बदल्यण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाच्या अभिप्रायावरच विभाजनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.