शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी मार्गस्थ होणार का ?...

By admin | Updated: May 1, 2017 03:12 IST

तुकाराम मुंढे यांनी ‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात लगेचच बदल होईल, असे नाही. पण ही बससेवा सक्षम करण्यासाठी मुंढे यांच्याकडून पुणेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेच महत्त्व मोठे आहे. दररोज दहा लाखांहून अधिक प्रवासी या सेवेचा उपयोग करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून ढिसाळ नियोजनामुळे पीएमपीचे तीनतेरा वाजले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमटी व पीसीएमटी या दोन स्वतंत्र संस्थाचे एकत्रीकरण करून ‘पीएमपी’ची निर्मिती करण्यात आली. तरीही बससेवेत फारसा बदल झाला नाही. उलट मागील काही वर्षांत ही सेवा अधिक डबघाईला आली. ताफ्यातील सुमारे १२०० बसपैकी ३०० ते ४०० बस देखभाल- दुरुस्तीअभावी जागेवर उभ्या आहेत. ‘पीएमपी’ची निर्मिती करताना या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद म्हणजे पीएमपीचे नेतृत्व आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपविण्यात आले. २००७पासून मागील दहा वर्षांत तेवढ्याच अधिकाऱ्यांनी पीएमपीची धुरा सांभाळली. पण सेवेत ठळक असा कोणताही बदल झाला नाही. डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे काही महिने अतिरिक्त भार देण्यात आला होता. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे पीएमपीला ‘अच्छे दिन’ येतील, असे चित्र निर्माण झाले होते. काही महिन्यांतच त्यांचीही बदली झाल्याने पुन्हा उतरती कळा लागली. त्यामुळे पुणेकरांकडून त्यांच्यासारख्याच सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक पीएमपीवर करण्याची मागणी केली जात होती. अखेर तुकाराम मुंढे यांच्या रूपाने पीएमपीला कार्यक्षम अधिकारी मिळाला. मुंढे यांच्या नियुक्तीचे काही संघटनांनी फटाके वाजवून स्वागत केले. लौकिकाप्रमाणे मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच पीएमपीच्या सुधारणेसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. शिस्त आणि कामातील नियमिततेवर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे. त्यामुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांना निलंबित तर काहींना बडतर्फ करण्याचे पाऊल त्यांनी उचलले. आतापर्यंत त्यांनी शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यातून अधिकारीही सुटलेले नाहीत. काहींचे निलंबन तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या निर्णयाबरोबरच त्यांनी कामकाजात अधिकाधिक आयटीचा वापर करण्यावर भर दिला आहे. ही सेवा प्रवासीकेंद्री करण्यासाठी विविध पातळ्यांवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील महिनाभरात त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गावरील बसमध्ये सुमारे १०० बसची भर पडली आहे. तर ब्रेकडाऊनचे प्रमाणही कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे पीएमपी सेवा सक्षम होईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांमध्येही निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतेक कर्मचारी त्यांना सहकार्य करीत आहेत. त्यांचे काही निर्णय वादग्रस्तही ठरले आहेत. कर्मचाऱ्यांवर सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे संघटना नाराज झाल्या आहेत. तर तोट्यातील काही मार्ग बंद केल्यामुळे प्रवासी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पण मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे पीएमपीमध्ये होत असलेले सकारात्मक बदल होत असल्याचे सर्वच जण मान्य करत आहेत. महिनाभरातच त्यांनी दाखवलेली कामाची चुणूक पीएमपीचे भवितव्य प्रकाशमान असल्याचे दर्शविते. पण आतापर्यंत पीएमपीला मिळालेले अध्यक्ष फार काळ याठिकाणी राहिले नाहीत. केवळ काही महिने किंवा वर्षभराची कारकीर्द मिळून त्यांची बदली झाली. त्यामुळे पीएमपीचा रुतलेला गाडा बाहेर निघू शकलेला नाही. त्याला राजकीय कुरघोडीची किनारही लाभलेली आहेच. नियोजनबद्ध कामकाजाअभावी दोन्ही शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीची दुर्दशा झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी पीएमपीचे नेतृत्व सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांनी घालून दिलेली व्यवस्थेवर पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यांनी भर दिला पाहिजे. या व्यवस्थेमध्ये बदलासाठी सातत्य राहिले तरच पीएमपी सक्षमीकरणाची अपेक्षा बाळगता येईल. - राजानंद मोरे