शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पीएमपी अधिक प्रवासीभिमुख करणार

By admin | Updated: March 30, 2017 02:33 IST

आधीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय कायम ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा अधिक

पुणे : आधीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय कायम ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा अधिक प्रवासीभिमुख करणे व कामकाजाला व्यावसायिक स्वरूप आणण्याला प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे संकेतही मुंढे यांनी दिले.मुंढे यांनी बुधवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात विद्यार्थिदशेत असताना ‘पीएमपी’ने प्रवास केल्याची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. ‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती, बस संचलन, बे्रकडाऊनचे प्रमाण, बससंख्या, प्रशासन तसचे इतर अडचणी काय आहेत, याचा अभ्यास करून अजेंडा ठरविला जाईल, असे सांगत मुंढे म्हणाले, नवी मुंबई पालिकेतील सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव आहे. तिथे सुमारे ५०० बस असून सुमारे तीन लाख प्रवासी आहेत. तिथल्या बससेवेत चांगली प्रगती केली आहे. इथल्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. पण ही संस्था व्यावसायिक दृष्टिकोनातून चालावी, असा प्रयत्न असेल. हे करताना उत्पन्न आणि खर्च या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)‘पीएमपी’ यापुर्वी राबविण्यात आलेली चांगली धोरणे पुढेही सुरूच ठेवली जातील. तसेच इतर वाहतुक यंत्रणांमधून चांगल्या गोष्टी मिळत असतील तर त्याचाही विचार केला जाईल. नवी मुंबईमध्ये काही गोष्टी चांगल्या होत्या. त्या इथे असतील तर चालु ठेवू, नसतील तर त्या आणल्या जातील. ही एक सुधारणेची प्रक्रिया आहे. प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजुन घ्यायला त्यांच्यात जायला मला काही अडचण वाटणार नाही, असे मुंढे यांनी सांगितले.जगातल्या कोणत्याही शहरात वाहतुक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कशी सक्षम करता येईल, हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आपण बससेवा पुरवू शकलो, तर निश्चितपणे आणि खासगी वाहने कमी करू शकतो. खासगी वाहने वाढण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुक चांगली करण्याला सगळीकडे प्राधान्य दिले जाते. हे करताना प्रवासी केंद्रस्थानी असतील. ‘उबेर’ सारख्या सेवा आयटीचा अधिक वापर आणि मागणीनुसार पुरवठा होत असल्याने यशस्वी ठरल्या आहेत. याचा विचार केल्यास सार्वजनिक सेवाही मागणीवर आधारीत होऊ शकतात. तसा दृष्टीकोन ठरवून काम करावे लागेल. त्यासाठी कष्ट करावे लागतील. त्याला किती वेळ लागेल हे सांगु शकत नाही. पण त्यामध्ये सातत्यपुर्ण सुधारणा व्हायला हव्यात. - तुकाराम मुंढे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपुणे महानगर परिवहन महामंडळ