शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

‘पीएमपी’ची नफ्याकडे धाव...

By admin | Updated: August 9, 2016 02:04 IST

कंपनी स्थापनेपासून तोट्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रा. लि.ची (पीएमपीएमएल) धाव नफ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कंपनीचा २0१५-१६च्या संचलन तुटीचे

पुणे : कंपनी स्थापनेपासून तोट्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रा. लि.ची (पीएमपीएमएल) धाव नफ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कंपनीचा २0१५-१६च्या संचलन तुटीचे लेखापरीक्षण अहवाल तयार झाला असून, या आर्थिक वर्षासाठी पीएमपीला १५१ कोटी ८0 लाख रुपयांची तूट आली आहे. एका बाजूला पीएमपी प्रवाशांची घटत असलेली संख्या, मार्गावर असलेल्या अपुऱ्या बस तसेच तिकिटांच्या वाढत्या दरामुळे प्रवाशांचा ओढा खासगी वाहनांकडे असतानाही, ही घटलेली तूट कंपनीच्या ढासळलेल्या कारभारास दिलासा देणारी आहे. २0१५-१६ या आर्थिक वर्षात कंपनीला ७७६ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले असून, ९२८ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे या लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)1पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दोन्ही महापालिकांच्या परिवहन समित्यांचे विलीनीकरण करून डिसेंबर २00७ मध्ये पीएमपीएमएल ही स्वतंत्र कंपनी सुरू करण्यात आली. त्यात दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी, बस, त्यांच्या आस्थापना एकाच छताखाली आणण्यात आल्या. मात्र, या कंपनीस कार्यक्षम आणि पूर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्याने स्थापनेच्या दुसऱ्या वर्षापासूनच या कंपनीचा तोट्याकडे प्रवास सुरू झाला.2पहिल्या वर्षी ९ कोटी संचलन तुटीपासून हे तुटीचे ग्रहण पीएमपीला लागले. २0११-१२ मध्ये ही तूट २२ कोटी ८७ लाख होती, १२-१३ मध्ये ६२ कोटी, १३-१४ मध्ये ९९ कोटी ४0 लाख तर १४-१५ मध्ये ही तूट तब्बल १६७ कोटी ६८ लाखांवर पोहोचली. त्यामुळे २0१५-१६ मध्ये पीएमपीच्या बसेस, घटती प्रवासीसंख्या लक्षात घेता हा आकडा २00 कोटींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ही तूट १६ कोटींनी घटून १५१ कोटींवर आली आहे.पीएमपीला २0१५-१६ या आर्थिक वर्षात वाहतूक संचलनातून घवघवीत उत्पन्न मिळाले आहे. अहवालानुसार, २0१४-१५ मध्ये संचलनातून ५५0 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हे उत्पन्न २0१५-१६ मध्ये तब्बल ६0९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजे संचलन उत्पन्नात तब्बल ५९ कोटी रुपयांची वार्षिक वाढ मिळालेली आहे. मात्र, एका बाजूला गेल्या वर्षभरात प्रवासी संख्या तब्बल १ ते दीड लाखांनी घटलेली आहे. त्यामुळे हे उत्पन्न वाढीव तिकीटदरातून मिळाले असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मार्गावरील बसची संख्याही घटत असल्याने जादा बस असत्या तर उत्पन्नात आणखी वाढ झाली असती, असा मतप्रवाह आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, पीएमपीची तूट दोन्ही महापालिकांनी देणे आवश्यक आहे. त्यानुसार, १५१.८0 लाख रुपयांच्या तुटीत पुणे महापालिकेस ६0 टक्के म्हणजेच ९१ कोटी ८ लाख रुपये, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेस ४0 टक्के म्हणजेच ६0.७२ टक्के रक्कम मोजावी लागणार आहे. दरम्यान, या दोन्ही महापालिकांनी ही तुटीची रक्कम १५0 कोटी रुपये गृहीत धरून त्यानुसार, मार्च २0१६ पासून समान हप्त्यांमध्ये ही रक्कम देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.