शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

‘पीएमपी’ला मिळाले २७ कोटी

By admin | Updated: January 7, 2015 00:38 IST

महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

पुणे : तोट्यातील ‘पीएमपी’वर केवळ टीका आणि टीकाच करून, आर्थिक मदत देण्यास आखडता हात घेणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यात नगर आणि आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गासाठी आयटीएमएस प्रणालीसाठी ११ कोटी ९७ लाख रुपये, पीएमपीची संचलन तूट भरून काढण्यासाठी १० कोटी रुपये; तसेच विद्यार्थी पास योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे तोट्यातील पीएमपीला आर्थिक हातभार लागणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी ही माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, पीएमपीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याने आधी कारभार सुधारावा, त्यानंतर निधी द्यावा, अशी भूमिका समिती सदस्यांकडून घेतली जात होती. मात्र, पीएमपीच्या सुधारणेसाठी प्रशासकीय कारभार मुद्रांक शुल्क आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनीही पीएमपी सक्षम करण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचे कर्णे यांनी सांगितले, तर डॉ. परदेशी यांच्याकडे पदभार असल्याने मनसेचाही त्यास विरोध राहणार नसल्याचे गटनेते बाबू वागसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)‘पीएमपी’साठी ‘स्थायी’ची खास सभा ४तोट्यातील पीएमपी बाहेर काढण्यासाठी; तसेच पीएमपीच्या सुधारणेसाठी भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यासाठी पुढील मंगळवारी स्थायी समितीने विशेष बैठक बोलाविली आहे. या बैठकीत डॉ. श्रीकर परदेशी सादरीकरण करणार असून, स्थायी समितीपुढे पीएमपीसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांसाठीची माहिती देणार असल्याचे कर्णे यांनी या वेळी सांगितले.पीएमपीला ‘अच्छे दिन’४पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे पीएमपीला नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ४यामध्ये बिघाड झालेल्या गाड्यांची समस्येचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत होता. पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या निधीतून पीएमपीचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ४यामुळे पीएमपीच्या प्रवाशांमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. पीएमपी शहरासहीत जिल्ह्याच्या काही भागात जाते. ४एकूणच तोट्यात गेलेल्या पीएमपीला ‘अच्छे दिन’ आले असल्याचेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.