शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

‘पीएमपी’ला मिळाले २७ कोटी

By admin | Updated: January 7, 2015 00:38 IST

महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

पुणे : तोट्यातील ‘पीएमपी’वर केवळ टीका आणि टीकाच करून, आर्थिक मदत देण्यास आखडता हात घेणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच कोणतेही आढेवेढे न घेता, ‘पीएमपी’साठी २६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यात नगर आणि आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गासाठी आयटीएमएस प्रणालीसाठी ११ कोटी ९७ लाख रुपये, पीएमपीची संचलन तूट भरून काढण्यासाठी १० कोटी रुपये; तसेच विद्यार्थी पास योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे तोट्यातील पीएमपीला आर्थिक हातभार लागणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी ही माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, पीएमपीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याने आधी कारभार सुधारावा, त्यानंतर निधी द्यावा, अशी भूमिका समिती सदस्यांकडून घेतली जात होती. मात्र, पीएमपीच्या सुधारणेसाठी प्रशासकीय कारभार मुद्रांक शुल्क आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनीही पीएमपी सक्षम करण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचे कर्णे यांनी सांगितले, तर डॉ. परदेशी यांच्याकडे पदभार असल्याने मनसेचाही त्यास विरोध राहणार नसल्याचे गटनेते बाबू वागसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)‘पीएमपी’साठी ‘स्थायी’ची खास सभा ४तोट्यातील पीएमपी बाहेर काढण्यासाठी; तसेच पीएमपीच्या सुधारणेसाठी भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यासाठी पुढील मंगळवारी स्थायी समितीने विशेष बैठक बोलाविली आहे. या बैठकीत डॉ. श्रीकर परदेशी सादरीकरण करणार असून, स्थायी समितीपुढे पीएमपीसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांसाठीची माहिती देणार असल्याचे कर्णे यांनी या वेळी सांगितले.पीएमपीला ‘अच्छे दिन’४पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे पीएमपीला नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ४यामध्ये बिघाड झालेल्या गाड्यांची समस्येचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत होता. पालिकेने निधी मंजूर केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या निधीतून पीएमपीचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ४यामुळे पीएमपीच्या प्रवाशांमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. पीएमपी शहरासहीत जिल्ह्याच्या काही भागात जाते. ४एकूणच तोट्यात गेलेल्या पीएमपीला ‘अच्छे दिन’ आले असल्याचेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.