शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पीएमपीच्या विभाजनाला नकार

By admin | Updated: March 25, 2017 03:58 IST

कामगार तसेच राजकीय हेतूने काही विशिष्ट गटाकडून मागणी होत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विभाजनाला पुणे महापालिका आयुक्तांनी नकार दिला

पुणे : कामगार तसेच राजकीय हेतूने काही विशिष्ट गटाकडून मागणी होत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विभाजनाला पुणे महापालिका आयुक्तांनी नकार दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनीही नकारच दिला असल्याचे समजते. राज्य सरकारने विभाजनाबाबत आयुक्तांचे मत मागवले होते.सन २००७मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन व पुणे महापालिका परिवहन या दोन सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले व पीएमपीची स्थापन झाली. एक कंपनी म्हणून ही सेवा कार्यरत आहे. त्यावर सरकारी नियंत्रण असले, तरी कामकाज स्वतंत्रपणे सुरू असते. गेल्या काही वर्षांत या सेवेचा तोटा वाढत असून दोन्ही महापालिकांना दर वर्षी या कंपनाला मोठी आर्थिक मदत करावी लागते. त्यामुळे कामगार संघटना व काही राजकीय पक्षांकडून मागील काही वर्षांत या सेवा पुन्हा स्वतंत्र कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.राज्य सरकारने याची दखल घेऊन दोन्ही पालिका आयुक्तांकडून याबाबत अहवाल मागवला होता. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नकारात्मक अहवाल पाठविला आहे. त्यात त्यांनी एकत्रीकरण का केले त्या मुद्द्यांचीच उजळणी केली आहे. वेगवेगळ्या आस्थापना, शेजारच्या शहरात सेवा देताना येणाऱ्या अडचणी, वेळापत्रकाची अडचण, वेगळा खर्च, इंधनाचा अपव्यय अशा बऱ्याच गोष्टींचा तत्कालीन समितीने विचार करूनच एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तेच मुद्दे आताही तसेच असून विभाजन केल्यास त्याला तोंड द्यावे लागेल, असे आयुक्तांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनीही या विभाजनाला नकारच दिला असल्याचे समजते. पीएमपीमधील काही कामगार संघटनांकडून विभाजनाची मागणी केली जात आहे; मात्र अधिकाऱ्यांचा त्याला विरोध आहे. त्यांच्यातील अनेकांनी तो जाहीरपणे व्यक्तही केला आहे. यालाच अनुसरून दोन्ही पालिकांच्या आयुक्तांनी सरकारला नकारात्मक अहवाल पाठविल्याची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)