शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पीएमपीची वाहक भरती परीक्षा रद्द

By admin | Updated: July 23, 2014 23:40 IST

पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू  केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमकेसीएलच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांपूर्वीच राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या भरतीसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, आता  पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसताना ही भरती करून त्यांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले असल्याची माहिती संचालक प्रशांत जगताप यांनी आज दिली. 
    केंद्राच्या  जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसह (जेएनएनयूआरएम) डिफर्ड पेमेंट आणि भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात पंधराशेहून अधिक बस दाखल होणार आहेत.  त्यामुळे ताफ्यातील बसची संख्या वाढल्याने कर्मचा:यांवर ताण येऊ नये, यासाठी बस येण्याआधीच त्यासाठी वाहकांची भरती करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. त्यासाठी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) माध्यमातून सर्व ऑनलाइन प्रक्रिया राबविली गेली. गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, भाडेतत्त्वावरील बसचा अपवाद वगळता उर्वरित 1 हजार बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाच रखडली आहे. मात्र, असे असतानाच ही भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आधीच बसून असलेल्या कर्मचा:यांना काम देणो शक्य नसताना नवीन कर्मचा:यांना काम देता येणार नसल्याची बाब संचालक मंडळाच्या लक्षात आली.  
भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन पीएमपीत रुजू झाल्यानंतर संबंधित सेवकांना काम देता आले नाही, तर त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून ही प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन बस ताफ्यात दाखल होण्याचा कृती अहवाल तयार होईपयर्ंत पुढील प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले. तसेच, कंडक्टर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया संशयास्पद होती. एमकेसीएलतर्फे त्यासाठी काढण्यात आलेला पेपरही अवघड होता. त्यामुळे, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी 
केली आहे.(प्रतिनिधी)
 
संचालक मंडळ 
झोपले होते काय ?
प्रशासनाने राबविलेली ही प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी लेखी परीक्षाही झाली. मात्र, अचानक ही फसवणूक असल्याचा साक्षात्कार संचालक मंडळास झाला आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झोपलेले संचालक मंडळ जागे झाले काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.