शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

पीएमपीची वाहक भरती परीक्षा रद्द

By admin | Updated: July 23, 2014 23:40 IST

पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू  केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमकेसीएलच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांपूर्वीच राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या भरतीसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, आता  पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसताना ही भरती करून त्यांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले असल्याची माहिती संचालक प्रशांत जगताप यांनी आज दिली. 
    केंद्राच्या  जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसह (जेएनएनयूआरएम) डिफर्ड पेमेंट आणि भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात पंधराशेहून अधिक बस दाखल होणार आहेत.  त्यामुळे ताफ्यातील बसची संख्या वाढल्याने कर्मचा:यांवर ताण येऊ नये, यासाठी बस येण्याआधीच त्यासाठी वाहकांची भरती करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. त्यासाठी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) माध्यमातून सर्व ऑनलाइन प्रक्रिया राबविली गेली. गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, भाडेतत्त्वावरील बसचा अपवाद वगळता उर्वरित 1 हजार बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाच रखडली आहे. मात्र, असे असतानाच ही भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आधीच बसून असलेल्या कर्मचा:यांना काम देणो शक्य नसताना नवीन कर्मचा:यांना काम देता येणार नसल्याची बाब संचालक मंडळाच्या लक्षात आली.  
भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन पीएमपीत रुजू झाल्यानंतर संबंधित सेवकांना काम देता आले नाही, तर त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून ही प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन बस ताफ्यात दाखल होण्याचा कृती अहवाल तयार होईपयर्ंत पुढील प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले. तसेच, कंडक्टर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया संशयास्पद होती. एमकेसीएलतर्फे त्यासाठी काढण्यात आलेला पेपरही अवघड होता. त्यामुळे, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी 
केली आहे.(प्रतिनिधी)
 
संचालक मंडळ 
झोपले होते काय ?
प्रशासनाने राबविलेली ही प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी लेखी परीक्षाही झाली. मात्र, अचानक ही फसवणूक असल्याचा साक्षात्कार संचालक मंडळास झाला आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झोपलेले संचालक मंडळ जागे झाले काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.