शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची वाहक भरती परीक्षा रद्द

By admin | Updated: July 23, 2014 23:40 IST

पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू  केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमकेसीएलच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांपूर्वीच राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या भरतीसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, आता  पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसताना ही भरती करून त्यांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले असल्याची माहिती संचालक प्रशांत जगताप यांनी आज दिली. 
    केंद्राच्या  जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसह (जेएनएनयूआरएम) डिफर्ड पेमेंट आणि भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात पंधराशेहून अधिक बस दाखल होणार आहेत.  त्यामुळे ताफ्यातील बसची संख्या वाढल्याने कर्मचा:यांवर ताण येऊ नये, यासाठी बस येण्याआधीच त्यासाठी वाहकांची भरती करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. त्यासाठी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) माध्यमातून सर्व ऑनलाइन प्रक्रिया राबविली गेली. गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, भाडेतत्त्वावरील बसचा अपवाद वगळता उर्वरित 1 हजार बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाच रखडली आहे. मात्र, असे असतानाच ही भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आधीच बसून असलेल्या कर्मचा:यांना काम देणो शक्य नसताना नवीन कर्मचा:यांना काम देता येणार नसल्याची बाब संचालक मंडळाच्या लक्षात आली.  
भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन पीएमपीत रुजू झाल्यानंतर संबंधित सेवकांना काम देता आले नाही, तर त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून ही प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन बस ताफ्यात दाखल होण्याचा कृती अहवाल तयार होईपयर्ंत पुढील प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले. तसेच, कंडक्टर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया संशयास्पद होती. एमकेसीएलतर्फे त्यासाठी काढण्यात आलेला पेपरही अवघड होता. त्यामुळे, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी 
केली आहे.(प्रतिनिधी)
 
संचालक मंडळ 
झोपले होते काय ?
प्रशासनाने राबविलेली ही प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी लेखी परीक्षाही झाली. मात्र, अचानक ही फसवणूक असल्याचा साक्षात्कार संचालक मंडळास झाला आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झोपलेले संचालक मंडळ जागे झाले काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.