पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमकेसीएलच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांपूर्वीच राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये या भरतीसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, आता पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसताना ही भरती करून त्यांची फसवणूक करण्यापेक्षा सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले असल्याची माहिती संचालक प्रशांत जगताप यांनी आज दिली.
केंद्राच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसह (जेएनएनयूआरएम) डिफर्ड पेमेंट आणि भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात पंधराशेहून अधिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे ताफ्यातील बसची संख्या वाढल्याने कर्मचा:यांवर ताण येऊ नये, यासाठी बस येण्याआधीच त्यासाठी वाहकांची भरती करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. त्यासाठी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) माध्यमातून सर्व ऑनलाइन प्रक्रिया राबविली गेली. गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, भाडेतत्त्वावरील बसचा अपवाद वगळता उर्वरित 1 हजार बस ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रियाच रखडली आहे. मात्र, असे असतानाच ही भरती प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आधीच बसून असलेल्या कर्मचा:यांना काम देणो शक्य नसताना नवीन कर्मचा:यांना काम देता येणार नसल्याची बाब संचालक मंडळाच्या लक्षात आली.
भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन पीएमपीत रुजू झाल्यानंतर संबंधित सेवकांना काम देता आले नाही, तर त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून ही प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन बस ताफ्यात दाखल होण्याचा कृती अहवाल तयार होईपयर्ंत पुढील प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आदेश संचालक मंडळाने प्रशासनाला दिले. तसेच, कंडक्टर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया संशयास्पद होती. एमकेसीएलतर्फे त्यासाठी काढण्यात आलेला पेपरही अवघड होता. त्यामुळे, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी
केली आहे.(प्रतिनिधी)
संचालक मंडळ
झोपले होते काय ?
प्रशासनाने राबविलेली ही प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी लेखी परीक्षाही झाली. मात्र, अचानक ही फसवणूक असल्याचा साक्षात्कार संचालक मंडळास झाला आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झोपलेले संचालक मंडळ जागे झाले काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.