शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

पीएमपी बस झाली प्रवाशांना नकोशी

By admin | Updated: May 15, 2016 00:45 IST

पीएमपीच्या प्रवासी संख्येमधील घट सुरूच असून, मार्च २०१६ मध्ये प्रवासीसंख्या तब्बल ७० हजारांनी घटली आहे. एकीकडे प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध गाड्यांची संख्या

पुणे : पीएमपीच्या प्रवासी संख्येमधील घट सुरूच असून, मार्च २०१६ मध्ये प्रवासीसंख्या तब्बल ७० हजारांनी घटली आहे. एकीकडे प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध गाड्यांची संख्या कमी असल्याने पीएमपी नव्या गाड्या ताफ्यात सहभागी करण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे प्रवासी संख्या चिंताजनक स्वरूपात घटत आहे. फेब्रुवारीत असलेली १० लाख ८० हजार प्रवासी संख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजारांवर खाली आहे. एकाच महिन्यात प्रवाशांचा आकडा ७० हजाराने कमी झाल्याने नव्या गाड्यांचा काय उपयोग होणार, अशा प्रश्न पीएमपी प्रवासी मंचाने उपस्थित केला आहे.पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २००९ ते २०१५ दरम्यान १० लाखांच्या आसपास राहिली आहे. मात्र, याच कालावधीत बसची संख्या १५११ वरून २०४५ वर गेली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढूनही प्रवासी संख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, तरीही आगामी निवडणुका समोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी नव्या गाड्या खरेदीचा घाट घातला जात असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केला आहे.गेल्या सात वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ५०० बसची वाढ झाली आहे. मात्र, प्रतिबस प्रवासी संख्या आणि ताफ्यातील बसचा वापर कमी-कमी होत चालला आहे. २००९ मध्ये सुमारे ८०० प्रतिबस असलेली प्रतिबस प्रवासीसंख्या ६०० वर आली आहे. त्यामुळे बससाठी वाहनतळ, प्रवासी वाढ, सुरक्षितता, संचलनातील कार्यक्षमता, पीएमपीवर आर्थिक बोजा न टाकता मिनी बस व टप्प्या-टप्प्याने गरजेनुसार गाड्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रवासी मंचाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)