शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी बस झाली प्रवाशांना नकोशी

By admin | Updated: May 15, 2016 00:45 IST

पीएमपीच्या प्रवासी संख्येमधील घट सुरूच असून, मार्च २०१६ मध्ये प्रवासीसंख्या तब्बल ७० हजारांनी घटली आहे. एकीकडे प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध गाड्यांची संख्या

पुणे : पीएमपीच्या प्रवासी संख्येमधील घट सुरूच असून, मार्च २०१६ मध्ये प्रवासीसंख्या तब्बल ७० हजारांनी घटली आहे. एकीकडे प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध गाड्यांची संख्या कमी असल्याने पीएमपी नव्या गाड्या ताफ्यात सहभागी करण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे प्रवासी संख्या चिंताजनक स्वरूपात घटत आहे. फेब्रुवारीत असलेली १० लाख ८० हजार प्रवासी संख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजारांवर खाली आहे. एकाच महिन्यात प्रवाशांचा आकडा ७० हजाराने कमी झाल्याने नव्या गाड्यांचा काय उपयोग होणार, अशा प्रश्न पीएमपी प्रवासी मंचाने उपस्थित केला आहे.पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २००९ ते २०१५ दरम्यान १० लाखांच्या आसपास राहिली आहे. मात्र, याच कालावधीत बसची संख्या १५११ वरून २०४५ वर गेली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढूनही प्रवासी संख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, तरीही आगामी निवडणुका समोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी नव्या गाड्या खरेदीचा घाट घातला जात असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केला आहे.गेल्या सात वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ५०० बसची वाढ झाली आहे. मात्र, प्रतिबस प्रवासी संख्या आणि ताफ्यातील बसचा वापर कमी-कमी होत चालला आहे. २००९ मध्ये सुमारे ८०० प्रतिबस असलेली प्रतिबस प्रवासीसंख्या ६०० वर आली आहे. त्यामुळे बससाठी वाहनतळ, प्रवासी वाढ, सुरक्षितता, संचलनातील कार्यक्षमता, पीएमपीवर आर्थिक बोजा न टाकता मिनी बस व टप्प्या-टप्प्याने गरजेनुसार गाड्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रवासी मंचाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)