शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

पीएमपीचे बसथांबे बनले वाहनतळ

By admin | Updated: February 2, 2016 01:35 IST

पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे

पुणे : पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग तसेच उपनगरांमध्ये हे बसथांबे पार्किंग थांबे बनल्याने नागरिकांना बस मिळविण्यासाठी भर रस्त्यात थांबावे लागत असून, या अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर ना पीएमपी कारवाई करत आहे ना वाहतूक पोलीस. त्यामुळे हे बसथांबे काढून तरी टाका, अशा संतापजनक भावना हे प्रवासी व्यक्त करत आहेत.प्रवाशांच्या सुविधांसाठी पीएमपीकडून शहरात ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने प्रशासनाकडून हे थांबे पदपथावर उभारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबल्यास वाहतूककोंडी होऊ नये म्हणून त्याच्यासमोर बस थांबण्यासाठी दिशादर्शक पट्टे रस्त्यावर मारण्यात आले आहेत. मात्र, शहरात ज्या ठिकाणी नियमित वर्दळ आहे, तसेच पार्किंगसाठी जागा मिळत नाही, त्या ठिकाणी चक्क या बसथांब्यांवर अतिक्रमण करण्यात आले असून, थेट प्रवासी थांबण्याच्या जागेवरच वाहने पार्क केली जात आहे. विशेष म्हणजे या दुचाकी, चारचाकी, तर त्यात कमी म्हणून काय की रिक्षा थांबेही त्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. या वाहनांच्या आड प्रवासी थांबल्यास बसचालकाला अनेकदा ते दिसत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी पार्किंग केली आहे, त्या ठिकाणी न थांबता प्रवासी थेट रस्त्याच्या मध्यभागीच जीव मुठीत घेऊन थांबत आहेत. तर दुसरीकडे भर वर्दळीच्या रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी पीएमपी बस रस्त्याच्या मधोमध थांबत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघातांना सामोरे जावे लागत आहे.कारवाई कोण करणार? शहरात कोठेही वाहतुकीस अडथळा झाला तर त्यावर तोडगा काढण्याची तसेच जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्षात केवळ ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारे बसथांब्यांवर गाड्या लावल्याने एक प्रकारे वाहतूककोंडी तसेच वाहतुकीसही अडथळा होतो. त्यामुळे अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, काही बसथांब्यांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर ज्या पीएमपीचे हे प्रवासी आहेत, त्यांच्या या गैरसोयीकडे लक्ष देण्यासाठी पीएमपीलाही वेळ नाही. त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.