शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे बसथांबे बनले वाहनतळ

By admin | Updated: February 2, 2016 01:35 IST

पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे

पुणे : पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग तसेच उपनगरांमध्ये हे बसथांबे पार्किंग थांबे बनल्याने नागरिकांना बस मिळविण्यासाठी भर रस्त्यात थांबावे लागत असून, या अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर ना पीएमपी कारवाई करत आहे ना वाहतूक पोलीस. त्यामुळे हे बसथांबे काढून तरी टाका, अशा संतापजनक भावना हे प्रवासी व्यक्त करत आहेत.प्रवाशांच्या सुविधांसाठी पीएमपीकडून शहरात ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने प्रशासनाकडून हे थांबे पदपथावर उभारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबल्यास वाहतूककोंडी होऊ नये म्हणून त्याच्यासमोर बस थांबण्यासाठी दिशादर्शक पट्टे रस्त्यावर मारण्यात आले आहेत. मात्र, शहरात ज्या ठिकाणी नियमित वर्दळ आहे, तसेच पार्किंगसाठी जागा मिळत नाही, त्या ठिकाणी चक्क या बसथांब्यांवर अतिक्रमण करण्यात आले असून, थेट प्रवासी थांबण्याच्या जागेवरच वाहने पार्क केली जात आहे. विशेष म्हणजे या दुचाकी, चारचाकी, तर त्यात कमी म्हणून काय की रिक्षा थांबेही त्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. या वाहनांच्या आड प्रवासी थांबल्यास बसचालकाला अनेकदा ते दिसत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी पार्किंग केली आहे, त्या ठिकाणी न थांबता प्रवासी थेट रस्त्याच्या मध्यभागीच जीव मुठीत घेऊन थांबत आहेत. तर दुसरीकडे भर वर्दळीच्या रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी पीएमपी बस रस्त्याच्या मधोमध थांबत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघातांना सामोरे जावे लागत आहे.कारवाई कोण करणार? शहरात कोठेही वाहतुकीस अडथळा झाला तर त्यावर तोडगा काढण्याची तसेच जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्षात केवळ ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारे बसथांब्यांवर गाड्या लावल्याने एक प्रकारे वाहतूककोंडी तसेच वाहतुकीसही अडथळा होतो. त्यामुळे अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, काही बसथांब्यांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर ज्या पीएमपीचे हे प्रवासी आहेत, त्यांच्या या गैरसोयीकडे लक्ष देण्यासाठी पीएमपीलाही वेळ नाही. त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.