शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

पीएमपी घेणार ‘बेस्ट, बीएमटीसी’चा आदर्श

By admin | Updated: April 22, 2015 05:42 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) स्थिती सुधारण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाचा

राजानंद मोरे, पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) स्थिती सुधारण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाचा (बीएमटीसी) आदर्श घेतला जाणार आहे. त्यासाठी ‘पीएमपी’तील काही वरिष्ठ अधिकारी व सल्लागारांची टीम नुकतीच दोन्ही ठिकाणी जावून पाहणी करून आली. यामध्ये सर्वच बाबतीत ‘पीएमपी’ची बससेवा खूपच मागे असल्याचे आढळून आले. ‘पीएमपी’तील या त्रुटी दूर करण्यासाठी ‘बेस्ट’ व ‘बीएमटीसी’मधील चांगल्या बाबी टप्प्याटप्प्याने ‘पीएमपी’मध्ये आणल्या जाणार आहेत. शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या आणि दररोज सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा पुरविणाऱ्या ‘पीएमपी’ला झळाळी देण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न केले जात आहेत. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी मागील चार महिन्यांपुर्वी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे. सध्या ताफ्यातील जास्तीत जास्त गाड्या मार्गावर आणण्याबरोबरच रस्त्यावर बंद पडणाऱ्या बसचे प्रमाण, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे मुख्य आव्हान आहे. तसेच अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याबरोबच त्यांना चांगली सेवा देण्यासही प्राधान्य द्यावे लागणार आहे. यामध्ये गेलेल्या ‘बेस्ट’ आणि ‘बीएमटीसी’ची बससेवा नावाजली गेलेली आहे. त्यामुळे पीएमपीने दोन्ही सेवांचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टी पीएमपीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पीएमपीतील काही वरिष्ठ अधिकारी व सल्लागारांनी दोन्ही उपक्रमांना भेटी देवून पाहणी केली. संबंधित अधिकारी त्याचा अहवाल तयार करून पीएमपीमध्ये करावयाच्या सुधारणांचा लेखाजोखा मांडणार आहेत. बस, आगार, प्रवासी संख्या, कार्यशाळा, कुशल कर्मचारी, ब्रेकडाऊनचे प्रमाण, उत्पन्न, बसचा इंधन वापर अशा सर्वच मापदंडांमध्ये बेस्ट आणि बीएमटीसी पीएमपीपेक्षा खुपच पुढे आहेत. पुणे आणि बंगळुरूची लोकसंख्या जवळपास सारखी आहे. मात्र तरीही दोन्ही शहरांचा विचार केल्यास त्याठिकाणी बससंख्या अनुक्रमे सुमारे २२०० व ६५०० एवढी आहे. तर मुंबईत ४२०० बस रस्त्यावर धावतात. बससंख्या अधिक असल्याने प्रवासी संख्या तसेच उत्पन्नातही साहजिकच दोन्ही शहरे पुण्यापेक्षा आघाडीवर आहेत. योग्य व्यवस्थापन आणि देखभाल-दुरूस्तीची कामे वेगाने होत असल्याने दोन्ही शहरांमधील बसवाहतुक यशस्वी ठरल्याचे पीएमपीतील अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)