शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मजुरांच्या हालअपेष्टा, फुटपाथवर झोपणे आणि पाण्यावर दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST

पुणे : पुण्यातील हजारो मजूर रस्त्यावर आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे सगळ्यांनी आपली नोकरी गमावली. यातील अर्धेअधिक ...

पुणे : पुण्यातील हजारो मजूर रस्त्यावर आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे सगळ्यांनी आपली नोकरी गमावली. यातील अर्धेअधिक मजूर हे हॉटेल व्यवसायातील आहेत. या सर्व मजुरांची आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे की शौचास जाण्यासाठी लागणारे पाच रुपयेही त्यांच्या खिशात नाही. काही मजूर तर दिवसदिवस फक्त पाण्यावर काढतात. फुटपाथवर झोपले असताना काहींची पाकीटेही चोरीस गेली आहेत. पुण्यातील हे मजूर महाराष्ट्रभरातून विशेषतः सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, वर्धा, बीड येथून आले आहेत. त्याचबरोबर अनेक जण दार्जिलिंग, उत्तर प्रदेश, बिहार या भागातूनही आले आहेत. हॉटेल व्यवसाय, छोटी दुकाने, हमाली काम करणारे हे मजूर आहेत. निर्बंधांमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, कॅफे, इव्हेंट्स, लहानसहान दुकाने सगळंच एकाएकी बंद करावं लागलंय. जोपर्यंत सुरू होतं तोपर्यंत मालकानं राहायला जागा आणि पगार दिला खरा, पण आता मालकाच्याच कामाला कुलूप लागल्यानं त्याच्याकडचे सगळे मजूर त्यानं काढून टाकले. ज्याचा परिणाम म्हणजे पुण्यात सध्या काही जागा मजुरांचे अड्डे झाल्या आहेत. शनिवारवाडा, महाराणा प्रताप गार्डन, स्वारगेट सर्कल, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा काही जागा मिळून जवळपास हजारच्या आसपास मजूर रस्त्यावरच राहत आहेत.

हे मजूर अजुनही कामाच्या शोधात आहेत, तर काहींना घरी जायचंय पण पैसे नाहीत, म्हणूनही काम शोधताहेत. निदान दोन वेळचं अन्न आणि डोक्यावर छत एवढीच या मजुरांची गरज.

सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन

गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊन लागला त्यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या होत्या. मात्र, सध्या हे चित्र अभावानेच दिसत आहे. नगर जिल्ह्यातील तीन कामगार दोन दिवसांपासून उपाशी होते. त्यांच्याकडे गावी जाण्यासाठीही पैसे नव्हते. भोई प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मिलिंद भोई यांनी त्यांची जेवणाची आणि गावी जाण्याची व्यवस्था केली. डॉ. भोई म्हणाले, व्यवहार सुरू झाल्यामुळे अनेक मजूर पुन्हा पुण्यात कामधंद्यासाठी आले आहेत. दोन-तीन महिन्यांतच पुन्हा उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे सेवाभावी संस्थांनी त्यांना मदत करणे गरजेचे आहे.