शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीने उडविली शहरवासीयांची दैना

By admin | Updated: July 3, 2014 05:45 IST

पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच भागांत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा झाला. एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

पिंपरी : पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच भागांत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा झाला. एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. काही भागात पुरेसा तर काहीत अत्यंत कमी पाणीपुरवठा झाल्याने पाण्यासाठी नागरिकांची दैना उडल्याचे दिसून आले. जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस न पडल्याने तसेच पवानाधरणातील पाणीसाठा घटल्याने महापालिकेने बुधवारपासून पाणीकपातीचे धोरण अवलंबिले आहे. पवना धरणातून बाराशे क्सुसेक ऐवजी हजार क्यसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे रावेत येथील पवनानदीवरील जलउपसा केंद्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. याबाबत ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी पहिल्या दिवशीच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यातून पहिल्या दिवसाचे नियोजन विस्कळीत झाल्याचे आढळून आले. पहिलाच दिवस असल्याने पाणीटंचाई फारशी जाणवली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, समाविष्ट गावात एक वेळेस पाणीपुरवठा झाला. तर उंच भागावरील उंच इमारतीमध्ये पाणी चढले नाही. त्यामुळे नागरिकांना खालील मजल्यावर येऊन पाणी भरावे लागले. काळेवाडी, वाकड काळाखडक, झोपडपट्ट्यांच्या परिसरात कमी दाबामुळे पाण्यासाठी नळजोडावर तासं्नतास ताटकळत उभे रहावे लागले. नागरिकांनी केला पाणीसाठामंगळवारी सायंकाळी उपनगरांमध्ये नियमितपणे पाणीपुरवठा झाला होता. पाणी कपातीची कल्पना असल्याने नागरिकांनी साठा केला होता. आज एकवेळ पाणीपुरवठा झाला असला तरी पिण्याच्या पाण्यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे आढळून आले. पाणीपुरवठा आढावा बैठकशहर परिसरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू झाला आहे. याविषयी सायंकाळी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शहर अभियंता महावीर कांबळे यांनी घेऊन पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘कालपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होता. त्यामुळे आज एकवेळी पाणी आले असले तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. उद्यापासून याबाबतचा परिणाम जाणवेल. दररोज शंभर टक्के पाणी सोडले जात असले तरी आता ते पाणी ८० टक्के सोडले आहे. निम्म्याने कपात केलेली नाही, याबाबत आठवड्याचा आढावा घेतला जाणार आहे. पुरेसा पाऊस पडला नाही, तर टप्प्याटप्प्याने ही कपात वाढविली जाईल. पाऊस पडला तर पाणी कपात कमी केली जाईल.’’रहाटणी : रामनगर येथील बळीराम कॉलनी, रायगड, सज्जनगड, राजगड कॉलनी परिसरात आज कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे या भागातील लोकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. शहरात दोनवेळा पाणीपुरवठा केला जात असला तरी, या भागात एकवेळेला पाणी येत आहे. आजचा पाणीपुरवठाही विस्ळीत झाला होता. वेळेचे नियोजनही फसल्याचे दिसून आले. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपळे सौदागर परिसरातही एकवेळ पाणीपुरवठा झाला.आकुर्डी : आकुर्डी गावठाण, निगडी, प्राधिकरण, गंगानगर, सिंधूनगर तसेच सेक्टर २४ ते २९ मध्ये सकाळी पाणीपुरवठा झाला. सायंकाळी काही प्रमाणात कमी दाबाने पाणी आले. तर काही भागात पाणी आलेच नाही. पाणी कपात झाली असली तरी पहिल्या दिवशी त्याचा या भागात फारसा परिणाम जाणवला नाही.काळेवाडी : आनंद कॉलनी, सहकार कॉलनी, अश्विनी कॉलनी, नढेनगर, विजयनगर, राजवाडे कॉलनी या भागात सकाळी पाणी आले नाही. सायंकाळी पाणी आले होते. हा पुरवठाही सुरळीत नव्हता. पाण्याचा दाबही कमी होता. या भागातनेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होता, अशी नागरिकांची तक्रार आहे. एकवेळ पाणी आल्याने टंचाईत काहीशी भर पडली.(प्रतिनिधी)