शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उमेदवारीच्या वादंगावर आयुक्त निरुत्तर

By admin | Updated: February 8, 2017 03:30 IST

महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची भाजपाची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली असताना अचानक त्यामध्ये बदल करून त्यांना

पुणे : महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची भाजपाची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली असताना अचानक त्यामध्ये बदल करून त्यांना भाजपाचे उमेदवार घोषित करण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रश्नांची विचारणा करण्यात आली असता ते अक्षरश: निरुत्तर झाले. निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून भाजपाच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्याचा खुलासा त्यांनी या वेळी केला.महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मध्ये रेश्मा भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आॅनलाइन अर्ज भरला होता. अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या वेळी दुपारचे २ वाजल्याने आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपून गेली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नावाने भरलेला अर्ज व भाजपाचे एबी फॉर्म जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केला. त्यांच्या अर्जाची छाननी करताना आॅनलाइन अर्जात भरलेल्या पक्षाचे नाव व जोडलेले एबी फॉर्म यामध्ये विसंगती आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी त्यांची भाजपाची उमेदवारी ग्राह्य न मानता त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरला होता. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी रेश्मा भोसले यांचे प्रकरण विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले. निवडणूक आयोगाने भोसले यांची भाजपाची उमेदवारी ग्राह्य मानण्यात यावी, असे आदेश दिले. त्यानुसार भोसले यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. आयुक्तांनी केवळ भोसले यांचेच प्रकरण विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाकडे प्रकरण पाठविण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. (प्रतिनिधी) आयुक्तांना विचारण्यात आलेले प्रश्नआॅनलाइन अर्जाची मुदत २ वाजता संपली असतानाही त्यांची भाजपाची उमेदवारी का ग्राह्य धरली?केवळ रेश्मा भोसले यांचेच प्रकरण निवडणूक आयोगाकडे का पाठविले?निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागितले नसतानाही आयोगाचा सल्ला का मागितला गेला? अर्ज भरताना तांत्रिक चुका झालेल्या केवळ भाजपाच्याच उमेदवारांना सवलत दिली गेली का?