शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मंचरला प्लॅस्टिकचे दुकान आगीत भस्मसात

By admin | Updated: April 26, 2017 02:58 IST

येथील शिवाजी चौकातील सिद्धेश प्लॅस्टिक या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रात्री भीषण आग लागून दुकान जळून खाक झाले. पाच तासांच्या

मंचर : येथील शिवाजी चौकातील सिद्धेश प्लॅस्टिक या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रात्री भीषण आग लागून दुकान जळून खाक झाले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता आग विझविण्यात यश आले. मात्र सकाळी ११ वाजता आग पुन्हा भडकली. स्थानिक तरुण तसेच अग्निशामक बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश आले. या आगीत पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतून शेजारचे कापड, तसेच इतर दुकाने सुदैवाने वाचली. मंचर शहराच्या शिवाजी चौकात घोडेगाव रस्त्यावर ओळीने दुकाने आहेत. त्यातील या दुकानात प्लॅस्टिकचे साहित्य विक्रीसाठी तसेच गोदामामध्ये साठवले होते. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. समोरच असलेल्या मशिदीत मुस्लिमबांधव जमले होेते. त्यांनी ही आग सर्वप्रथम पाहिली. तेथील तरुणांनी तातडीने आग विझविण्यासाठी धाव घेतली. आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, आतमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंनी पेट घेतल्याने आगीने उग्र रूप धारण केले. सरपंच दत्ता गांजाळे, तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी आले. राजगुरुनगर व जुन्नर नगरपालिकांचा आगीचा बंब बोलाविण्यात आला. तोपर्यंत स्थानिक टँकरमालक संपत दैने, कैलास गांजाळे, सुनील जोरी, संदीप वाबळे त्यांच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता आग पूर्णपणे विझली गेली. सकाळी ११ वाजता आग पुन्हा भडकली. प्लॅस्टिकचे साहित्य वितळले असल्याने आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केल्याने आकाशात धुराचे लोट निर्माण झाले होते. क्षणाचाही विलंब न लावता तरुण पुन्हा आग विझविण्यासाठी धावले. काही तरुण धाडसाने आत जात आगीवर पाणी मारत होते. पाण्याचा मारा करून भडकलेली आग विझविण्यात आली. यादरम्यान राजगुरुनगर व जुन्नर नगरपालिकांचे बंब पुन्हा आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आत जाऊन धुमसणारी आग विझविली. त्यानंतर जेसीबी बोलावून हे दुकान मोडून त्यातील जळलेला माल बाहेर काढण्यात आला.आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल खात्याने केला आहे. आगीत पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांच्या तत्परतेने आग आजूबाजूला पसरली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शहरातील मंचर-घोडेगाव रस्ता बंद होता. (वार्ताहर)