शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भिंतींवरील रोपांना मिळाला पुनर्जन्म, तळजाईवर हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:13 IST

तळजाई वनविहारामध्ये, जाणीव जागृती फाउंडेशनतर्फे हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनतर्फे नागरिकांना अशी रोपं दान देण्याचे आवाहन करण्यात आले ...

तळजाई वनविहारामध्ये, जाणीव जागृती फाउंडेशनतर्फे हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनतर्फे नागरिकांना अशी रोपं दान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्याकडे नको असलेली रोपं त्यांना दिली. देवघरात आलेले नारळ, रोपात वाढलेले, वड, पिंपळ, आंबा अशी सुमारे ६७ रोपं मिळाली आणि ही रोपं तळजाईवर लावण्यात आली आहेत. त्यामुळे या रोपांचा जणूकाही पुनर्जन्मच झाला आहे. अन्यथा नागरिकांनी ही रोपं काढून इतरत्र कुठे तरी टाकली असती.

फाउंडेशनतर्फे ११ जुलै २०२१ पासून सुरुवात करण्यात आली. २२ ऑगस्ट रोजी त्याचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला. संस्थेतर्फे त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. पुढील काळात देखील असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे ईश्वर कसबे यांनी दिली. या उपक्रमात संस्थेचे अश्विनी कसबे, सोनाली भिंताडे, मालती जाधव, अक्षय जाधव, चेतन कदम, राहुल भिंताडे, जागृती कसबे, ऋग्वेद भिंताडे, चित्रा जाधव आदींनी सहभाग घेतला.

------------------------------

नांद्रुकची २० रोपांची लागवड

सुमारे २० रोपं ही नांद्रुक या झाडाची होती. या झाडाला खूप महत्त्व आहे. या झाडाच्या पानांचा रस वांतिकारक व कृमिनाशक असून दम्यावर हळद व मिरी यांसह तुपातून पोटात देतात. पक्ष्यांना हे झाड खूप आवडते. यावर घरटी करतात. लाकूड जळणासाठी वापरतात. सालीपासून बळकट धागा मिळतो, अशा सुंदर झाडे तळजाईवर लावली आहेत, असे ईश्वर कसबे यांनी सांगितले.