शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

संत कान्होपात्राच्या समाधिस्थळी पुणेकराने दिलेल्या तरटीच्या वेलीचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:09 IST

पुणे - संत वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या तरटी म्हणजेच वाघाटी या वनस्पतीचे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ...

पुणे - संत वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या तरटी म्हणजेच वाघाटी या वनस्पतीचे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात रोपण करण्यात आले. संत कान्होपात्रा यांची समाधी याच ठिकाणी आहे. पूर्वीचा तरटीचा वृक्ष वठल्यामुळे त्याच ठिकाणी त्या वृक्षाचे रोप लावण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा संत कान्होपात्रा यांच्या समाधीत वाघाटीला बहर येणार आहे. पुण्यातील वनस्पती संशोधक डॉ. सचिन पुणेकर यांनी हे रोप उपलब्ध करून पंढरपूरला पाठविले आहे.

विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळीत संत कान्होपात्रेने यांनी समाथी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रूपात कान्होपात्रेला पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले. तिथे या झाडाचे वाळलेले ओंडके होते. त्याचेच दर्शन वारकरी घेत असत. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. भाविकांच्या श्रद्धेचा व त्यांच्याविषयी असलेल्या भावनांचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा तरटीचे रोपण करण्याचा निर्णय घेतला.

वनस्पती संशोधक डॉ. पुणेकर म्हणाले,‘‘मंदिरातील तरटीचे झाड वठलेले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी हेच झाड लावावे यासाठी मी विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना पत्र पाठवून विनंती केली होती. त्यानंतर समितीने ते मान्य करून आज मुख्यमंत्री, वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत तरटीच्या झाडाचे रोपण करण्यात आले.’’

—————————————

दिवे घाटातून मूळ शोधून बनवले रोप

मंदिर समितीने परवानगी दिल्यानंतर डॉ. पुणेकर यांनी दिवे घाटातील डोंगरावर फिरून वाघाटी शोधले. त्याचे तयार करून ते पंढरपुरला पाठविले.

——————————————-

तरटीविषयी थोडंसं...

तरटीचा वेल हा बहुवर्षीय असून, खोड गोलाकार होते. फांद्या इतरत्र पसरतात. काटे वाघाच्या नखासारखी असल्याने या वेेलीला वाघेटी असेही म्हणतात. फुले पांढरी किंवा फिकट गुलाबी असतात. फळ गोल, हिरवट-तांबूस असते. बिया आणि गरयुक्त फळ पिकल्यावर लाल होऊन तडकते. वाघाटी उष्ण, उत्तेजक व पित्तनाशक आहे. उष्णतेमुळे अंगावर वळ उठल्यावर मूळ उगाळून लेप लावतात. क्षयरोगावर ही अत्यंत गुणकारी औषध आहे. फळ कफ, वायू यांचा नाश करते. फळ उगाळून पाण्यातून पोटदुखीवर इलाज म्हणून पिण्यासाठी देतात.