शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नियोजन करून ग्रामस्थांनी समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग नोंदवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

डॉ. राजेश देशमुख : गावांच्या प्रस्तावित नियोजनाबाबत आढावा बैठक बारामती: तालुक्यातील एकूण २२ गावांनी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये ...

डॉ. राजेश देशमुख : गावांच्या प्रस्तावित नियोजनाबाबत आढावा बैठक

बारामती: तालुक्यातील एकूण २२ गावांनी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. लोकसहभागातून काही गावात खूप चांगले काम झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवर नियोजन करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी गावांच्या प्रस्तावित नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, विभागीय समन्वयक आबा लाड, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ,पाणी फाउंडेशनचे नामदेवराव ननावरे, पृथ्वीराज लाड, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, पाणी फाउंडेशनचे काम करत असताना बहुतंशी ठिकाणी चांगली कामे झाली आहेत. ग्रामस्थांच्या चांगल्या सहभागामुळे काही ठिकाणी गावे टँकरमुक्त झाली आहेत, ही एक चांगली बाब आहे. शासकीय योजनांना लोकसमुहाची जोड मिळाली तर खूप चांगले काम होऊ शकते. बारामती तालुक्यातील २२ गावांपैकी ५ गांवानी स्पर्धेचे निकष पूर्ण केले आहेत. बाकीच्या गावांनीही स्पर्धेचे निकष पूर्ण करून त्यात सहभागी व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. बारामती तालुक्यात पाणी फाउंडेशनचा प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे. असाच समन्वय टिकवून ठेवून चांगल्या प्रकारे कामे करा, असेही त्यांनी सांगितले.

पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक अविनाश पोळ म्हणाले की, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा ४५ दिवसांची होती यात प्रथम तीन तालुके सहभागी झाले होते. यासाठी ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावाला एक करून कामे करून घेणे व गावाचा विकास करणे हीच पाणी फाउंडेशनची मुख्य भूमिका आहे.

बैठकीचे प्रस्ताविक पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आबा लाड यांनी केले. ग्रामसेवक दीपाली हिरवे आणि कृषी सहायक प्रवीण माने यांनी पाणी फाउंडेशनच्या देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा अनुभव सांगितला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वनपरीक्षक अधिकारी राहुल काळे यांनी मनोगत व्यक्त केली.