शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

इंद्रायणीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नियोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:10 IST

आळंदी : ‘तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावरील प्रलंबित कामे लवकरात-लवकर मार्गी लावली जातील. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ...

आळंदी : ‘तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावरील प्रलंबित कामे लवकरात-लवकर मार्गी लावली जातील. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासन स्तरावर विशेष नियोजन करून इंद्रायणीचे पावित्र्य अबाधित ठेवू,’ असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

आळंदी नगर परिषद व अविरत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आळंदीत 'माझी वसुंधरा अभियानांतर्गत' आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, आरोग्य समिती सभापती सागर भोसले, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले, मुख्याधिकारी अंकुश जाधव, अविरत फाउंडेशनचे संस्थापक निसार सय्यद आदींसह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

दरम्यान, ‘स्वच्छता राखू, प्रदूषण टाळू आणि निसर्गसंवर्धन करण्यासाठी कृतिशील व प्रयत्नशील राहू’ अशी पर्यावरण रक्षणाची शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी नगर परिषद सतत प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.

चौकट : आळंदी शहराला बुधवारी (दि.१३) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देत विविध कामांची पाहणी करत कामांचा आढावा घेतला. विशेषतः तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित कामांची तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची व मैलशुद्धी जागेची त्यांनी पाहणी केली.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख. समवेत मान्यवर.