शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नियोजनात फसली कचराकोंडी

By admin | Updated: July 9, 2016 03:59 IST

शहरात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून शहरात तब्बल तीन हजार

- सुनील राऊत, पुणे

शहरात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून शहरात तब्बल तीन हजार टन कचरा पडून आहे. त्यातच महापालिकेच्या हद्दीजवळील गावांमधूनही रात्रीच्या अंधारात कचरा शहराच्या हद्दीत आणून टाकला जात असल्याने आंबेगाव, नऱ्हे, बावधन, धायरी, कात्रज, कोंढवा तसेच हडपसर परिसरातील भागात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे. यातच हा कचरा तीन ते चार दिवसांपासून पडून त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेले लिचेट (काळे रासायनिक द्रव) रस्त्यावर येत असून, त्या काळ्या पाण्यातून वाट काढत पुणेकरांना मार्ग शोधावा लागत आहे. तर, पावसाने भिजलेल्या या कचऱ्याचे वजनही चांगलेच वाढले असल्याने ओला व सुका कचरा वेगळा करण्यात अडचणी येत आहेत.तीन हजार टन कचरा पडूनशहरात आठवडाभरापासून तब्बल तीन हजार टन कचरा पडून आहे. शहरात दरदिवशी सुमारे १,७०० टन कचऱ्याची निर्मिती होते. त्यातील केवळ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तर उर्वरित सुमारे ७०० टन कचरा तसाच पडून आहे. त्यातच पावसामुळे या कचऱ्याचे वजन वाढले असून, भिजलेला हा कचरा उचलणेही अवघड झाले आहे. महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी २५० टन रोकेम प्रकल्पात, ५०० टन कचऱ्याचे कॅपिंग, १०० टन कचऱ्यावर नोबोल प्रकल्पात, तर २०० टन कचऱ्यावर दिशा आणि अजिंक्य प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे.८० ते ९० गाड्या बंद महापालिकेच्या व्हेईकल विभागाकडे शहरातील कचरा उचलण्यासाठी सुमारे ४०० गाड्या आहेत. मात्र, चालकांची संख्या कमी असणे, गाड्यांची देखभाल-दुरुस्ती न होणे, गाड्यांचे आयुर्मान संपल्याने गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून दररोज तब्ब्बल ८० ते ९० गाड्या ब्रेकडाऊनच्या नावाखाली बंद असतात. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या मागणीनुसार कचरा उचलण्यासाठी बीआरसी मिळत नसल्याची क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तक्रार आहे. तर, अनेक वर्षांपासून नवीन गाड्यांची खरेदीच झालेली नसल्याने अनेक आयुर्मान संपलेल्या गाड्या वाहतुकीच्या वेळी बंद पडण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.पाच क्षेत्रीय कार्यालयांत कचऱ्याची गंभीर स्थितीशहरातील पाच प्रमुख क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कचऱ्याची स्थिती गंभीर बनली आहे. त्यात टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय, कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय तसेच ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय यांच्या काही भागाचा समावेश आहे. या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये चार दिवसांपासून कचराच उचलण्यात आला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहत असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर आलेल्या कचऱ्यामुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. कचरा उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या गाड्या व्हेईकल डेपोकडून मिळत नसल्याने कचरा उचलण्यात अडथळा येत असल्याच्या तक्रारीही काही क्षेत्रीय कार्यालयांनी थेट महापालिका आयुक्तांंकडे केलेल्या आहेत.झाडणकामही बंदच.. : पावसामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दररोज सकाळी करण्यात येणारे शहरातील बहुतांश ठिकाणचे झाडणकामही बंद करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी पावसामुळे गैरहजर असल्याने तसेच पाऊस पडल्याने ओला झालेला कचरा झाडताच येत नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. हा कचरा सुकल्याशिवाय उचलणे शक्य नसल्याने कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.पावसामुळे शहरातील कचरा उचलण्यात अडचणी येत आहेत; मात्र पाऊस थांबताच तातडीने हे काम हाती घेण्यात येईल. याशिवाय, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ब्रेकडाऊनचे प्रमाण थोडे वाढले असले, तरी तातडीने या गाड्यांवर चालक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कचरा पडून आहे; मात्र त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून तातडीने कचरा उचलला जाईल.- सुरेश जगताप (घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख )