शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

प्लेगप्रमाणे कोरोनाचा प्रभावही खूप वर्षे राहील : प्रा. सौम्यब्रत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

पुणे : 'कोरोना विषाणूवर शास्त्रीय, वैज्ञानिक, वैद्यकीय उपाय हेच एकमेव उत्तर आहे. सुरक्षेसाठी शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असले तरी ...

पुणे : 'कोरोना विषाणूवर शास्त्रीय, वैज्ञानिक, वैद्यकीय उपाय हेच एकमेव उत्तर आहे. सुरक्षेसाठी शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असले तरी समाजावर त्याचा राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम होत आहे. सामाजिक दरी वाढत आहे. कोरोनाशी लढताना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दृष्टिकोन भिन्न-भिन्न स्वरूपाचे आहेत; तरी स्वच्छता, मास्क वापरणे, लसीकरण या प्रक्रियेला सर्वांना सामारे जावे लागणारच आहे,' असे मत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. सौम्यब्रत चौधरी यांनी व्यक्त केले. ’साहित्य, नाट्य तसेच कला आणि शिक्षण या माध्यमातून प्लेगचा दीर्घकाळ परिणाम टिकून राहिला. प्लेगप्रमाणे कोरोनाचा प्रभावही खूप वर्षे राहील असेही ते म्हणाले.

विचारवंत प्रा. राम बापट स्मृती आॅनलाइन व्याख्यानात 'प्लेगचे प्रसंग ते महामारीचे नियम : रंगभूमी आणि रोगप्रतिकारशक्ती यांच्या बखरीतील काही अंश' हा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. रंगकर्मी मकरंद साठे आणि गजानन परांजपे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्राज फाउंडेशनचे आर्थिक सहकार्य मिळाले.

कोरोना महामारीमुळे जगावर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूरगामी परिणाम झाले आहेत. प्लेग महामारीचा पगडा शंभर वर्षे समाजमनावर राहिला; तसेच कोरोनाचाही पगडा दीर्घकाळ राहील. महामारीच्या काळात मानवीय दृष्टिकोन हरवतो. सामाजिक मूल्य आणि मानवी मनाला किंमत उरत नाही; समाजाकडे केवळ तांत्रिकपणे पाहिले जाते. हा अनुभव जगाला आला असल्याकडे प्रा. चौधरी यांनी लक्ष वेधले.

कोरोनाला चीनमध्ये सुरुवात झाली तरी हा साथरोग पाश्चिमात्य देशांमध्ये जलद गतीने पसरला आणि त्यांना पूर्वेकडील देशांच्या तुलनेत अधिक फटका बसला. पाश्चिमात्य देशांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा खूप आग्रह असल्याने निर्बंध, मास्क, लस याबाबतीत पूर्वेकडील देशांचा आदर्श ठेवला पाहिजे, असा सूर तिकडे उमटत आहे. साहित्य, नाट्य तसेच कला आणि शिक्षण या माध्यमातून प्लेगचा दीर्घकाळ परिणाम टिकून राहिला, असे सांगून कोरोनामुळे यापुढची महामारी कोणती आणि मानवजातीवरील अविचल निष्ठेसाठी तिला कसे थोपवायचे या दृष्टीने विचार सुरू झाला असून, या संशोधनाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. कोरोनाच्या प्रभावातून साहित्य, नाटक आणि इतर कलांमधून ताकदीने अभिव्यक्ती होऊ शकेल, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला.

--------------------------------------------------