शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कचरा प्रकल्पासाठी जागेला मुहूर्तच नाही

By admin | Updated: April 30, 2015 23:57 IST

देशातील आठव्या क्रमांकाचे महानगर म्हणून विकसित होणाऱ्या पुणे शहरात गेल्या दशकभरात कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

पुणे : देशातील आठव्या क्रमांकाचे महानगर म्हणून विकसित होणाऱ्या पुणे शहरात गेल्या दशकभरात कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी शहरात निर्माण दररोज ६०० ते ७०० टन कचरा निर्माण व्हायाचा हा आकडा आता थेट १५०० ते १६०० टनांवर पोहोचला आहे. त्यामुळे या समस्येची गंभीरता लक्षात येते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेस आवश्यक असलेल्या जागा देण्यास राज्यशासनाकडून आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेस हव्या असलेल्या जवळपास ७० ते ८० हेक्टर जागांचे प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी पडून आहेत. गेल्या दशकभरात पुणे शहराचा विकास झपाट्याने झाला आहे. शहराचा विस्तार जवळपास २४३ चौरस किलोमीटरचा विस्तार आहे. तर हद्दीलगतही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. परिणामी निर्माण होणारा कचराही वाढलेला आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच डेपोसाठी राज्यशासनाने महापालिकेस उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील १४३ एकर जागा महापालिकेस दिलेली आहे. या ठिकाणी २००६-०७ पर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया न करताच तो डंपिंग केला जात होता. मात्र, या कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने, या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाल्याने २००८ पासून आजअखेरपर्यंत हा डेपो बंद करण्यासाठी ग्रामस्थांकडून आंदोलने केली गेली. या प्रकल्पावरील भार हलका करायचा असल्यास आणि महापालिकेस निर्माण होणाऱ्या १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करावयाची असल्यास पालिकेस हद्दीजवळ मोठ्या प्रमाणात जागांची आवश्यकता आहे. त्यासाठी पालिकेकडून गेल्या चार ते पाच वर्षांपासून वारंवार राज्यशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, ग्रामस्थांनी आंदोलन पुकाल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी जागा देण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्याव्यतिरिक्त राज्यशासनाकडून काहीच होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)जागांचे प्रस्ताव पडून उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण़्याचे आश्वासन राज्यशासनाकडून गेल्या तीन ते चार वर्षांपासून दिले जात आहे. मात्र, हा डेपो बंद केल्यास आवश्यक असलेल्या पर्यायी जागा महापालिकेस देण्याबाबत मात्र आधी आघाडी शासनाने आणि आता युती शासनाकडून या जागांच्या फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर सरकविण्याव्यतिरिक्त काहीच होताना दिसत नाही. महापालिकेकडून नवीन कचरा प्रकल्प तसेच डेपोसाठी मोशी येथील खाणीची २५ हेक्टर, पिंपरी-सांडस येथील २0 हेक्टर, हडपसर व कोंढवा येथे समाजकल्याण व आरोग्य विभागाकडे असलेली जवळपास ५ हेक्टर, तर कचरा शास्त्रीय पद्धतीने भूगर्भात जिरविण्यासाठी वाघोली येथील खाणींची मागणी करण्यात आली आहे. जागांसाठी महापालिकेकडून स्मरणपत्रे पाठवून त्यांच्या स्वतंत्र फाईली तयार झाल्या. पण या जागा देण्यासाठी निर्णय घेण्यास शासनाला वेळ नाही.दृष्टिक्षेपात कचरा समस्या४दररोज निर्माण होणारा कचरा- १५०० ते १६०० टन ४कचरा डेपो - १ ( उरूळी देवाची)४प्रक्रिया प्रकल्प - १ (रोकेम )४बंद असलेले प्रकल्प - २ ( हंजर, सेल्को )४बायोगॅस प्रकल्प - २१ ४ओला कचरा प्रकल्प - २ ( अजिंक्य आणि दिशा )४आरक्षित जागा - ५ (ताब्यात एकही नाही)