शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पिसर्वे ग्रामपंचायतीचा पाणीप्रश्न मिटला

By admin | Updated: January 2, 2017 02:20 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे पिण्याच्या जलस्रोतांचे पाणी दूषित झाले आहे, तसेच पाण्यात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने

सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे पिण्याच्या जलस्रोतांचे पाणी दूषित झाले आहे, तसेच पाण्यात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यापासून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पिसर्वे ग्रामपंचायतीने शासनाच्या जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून ५ लाख खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून नागरिकांसाठी सुरू केला आहे. पिसर्वेच्या या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे. ग्रामपंचायतीने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर याची उभारणी करून केवळ पाच रुपयांच्या नाण्यात २० लिटर शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला आहे. या भागातील पाण्यात क्षारांचे प्रमाण ११०० ते १२०० पर्यंत आहे, माणसाच्या आरोग्यासाठी क्षारांचे प्रमाण केवळ १०० पर्यंत असणे गरजेचे आहे, या प्रकल्पातील पाण्यात क्षारांचे प्रमाण केवळ ५० आहे. सध्या या भागात प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी २० लिटर पाण्याच्या जारचा वापर होतो, त्यासाठी नागरिकांना ३० ते ४० रुपये प्रतिजार मोजावे लागतात. मात्र पिसर्वे ग्रामपंचायतीच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना केवळ ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी जिप सदस्य सुदाम इंगळे, विजयराव कोलते यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी सरपंच लक्ष्मी रवींद्र वाघमारे, उपसरपंच बायडाबाई कोलते, सदस्य मच्छिंद्र कोलते, गणेश कोलते, नितीन वायकर, याकूब सय्यद, सुनील कोलते, सदस्या शालन कासवेद, नंदा कोलते, संगीता कोल्हाळे, ग्रामसेविका शीतल फरांदे, माजी सरपंच शांताराम कोलते, संभाजी कोलते, शिवाजी कोलते, शांताराम कटके, शिवकुमार कोट्टलगी, अनिल शेंडगे, नितीन कोलते आदी उपस्थित होते.