शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पिसर्वे ग्रामपंचायतीचा पाणीप्रश्न मिटला

By admin | Updated: January 2, 2017 02:20 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे पिण्याच्या जलस्रोतांचे पाणी दूषित झाले आहे, तसेच पाण्यात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने

सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे पिण्याच्या जलस्रोतांचे पाणी दूषित झाले आहे, तसेच पाण्यात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यापासून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पिसर्वे ग्रामपंचायतीने शासनाच्या जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून ५ लाख खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून नागरिकांसाठी सुरू केला आहे. पिसर्वेच्या या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे. ग्रामपंचायतीने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर याची उभारणी करून केवळ पाच रुपयांच्या नाण्यात २० लिटर शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला आहे. या भागातील पाण्यात क्षारांचे प्रमाण ११०० ते १२०० पर्यंत आहे, माणसाच्या आरोग्यासाठी क्षारांचे प्रमाण केवळ १०० पर्यंत असणे गरजेचे आहे, या प्रकल्पातील पाण्यात क्षारांचे प्रमाण केवळ ५० आहे. सध्या या भागात प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी २० लिटर पाण्याच्या जारचा वापर होतो, त्यासाठी नागरिकांना ३० ते ४० रुपये प्रतिजार मोजावे लागतात. मात्र पिसर्वे ग्रामपंचायतीच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना केवळ ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी जिप सदस्य सुदाम इंगळे, विजयराव कोलते यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी सरपंच लक्ष्मी रवींद्र वाघमारे, उपसरपंच बायडाबाई कोलते, सदस्य मच्छिंद्र कोलते, गणेश कोलते, नितीन वायकर, याकूब सय्यद, सुनील कोलते, सदस्या शालन कासवेद, नंदा कोलते, संगीता कोल्हाळे, ग्रामसेविका शीतल फरांदे, माजी सरपंच शांताराम कोलते, संभाजी कोलते, शिवाजी कोलते, शांताराम कटके, शिवकुमार कोट्टलगी, अनिल शेंडगे, नितीन कोलते आदी उपस्थित होते.