शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडचे पाप आळंदीत नको

By admin | Updated: March 28, 2017 02:24 IST

पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट

शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडची घाण इंद्रायणी नदीत जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आळंदी देवाची येथे आयोजित स्वानंद सुखानिवासी सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारुतीमहाराज कुरेकर, आमदार संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार उल्हास पवार, महापौर नितीन काळजे, रामायणाचार्य रामरावजीमहाराज ढोक, बबनराव पाचपुते, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, अध्यक्ष संदीपानमहाराज पाटील हासेगावकर आदींसह अन्य मान्यवर तसेच लाखो भाविकांची मांदियाळी उपस्थित होती. मुख्यमंत्री म्हणाले, आळंदीत अशुद्ध पाण्याचा भाविकांना सामना करावा लागत आहे. आळंदी व पिंपरी-चिंचवडमधील समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे पुण्य आमच्या वाट्याला यावे, म्हणूनच या दोन्ही ठिकाणची सत्ता नागरिकांनी भाजपाकडे सुपूर्त केली आहे. तेव्हा पिंपरीतील पाप इकडे येऊ नये याची काळजी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांनी घ्यावी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘१३व्या शतकापासूनच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी संपूर्ण जगाच्या कल्याणाचा शाश्वत विचार करून जागतिकीकरणाची नांदी समोर मांडली होती. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र घडत आहे.’’ रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी प्रास्ताविक केले. संदीपानमहाराज पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर) निर्णय : जागेवर आरक्षण राहणार नाहीआळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या जागेवर टाकलेले आरक्षण काढण्यासंदर्भात आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या जागेवर कोणतेही आरक्षण राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एक कोटीची देणगी ‘फीविना विद्यार्थी व पगाराविना शिक्षक’ असे सूत्र असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी राज्य सरकार सदैव तत्पर असल्याचे सांगून राज्य सरकारच्या वतीने १ कोटी रुपयांची देणगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. समाजात शिक्षणाचा व्यापार होऊ लागला आहे. मात्र, मागील शंभर वर्षांत वारकरी शिक्षण संस्थेने विनामोबदला चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे. परिणामी, समाजात स्वच्छ परिवर्तनाची लाट निर्माण होऊ लागली आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक