शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पिंपरी-चिंचवडचे पाप आळंदीत नको

By admin | Updated: March 28, 2017 02:24 IST

पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट

शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडची घाण इंद्रायणी नदीत जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आळंदी देवाची येथे आयोजित स्वानंद सुखानिवासी सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारुतीमहाराज कुरेकर, आमदार संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार उल्हास पवार, महापौर नितीन काळजे, रामायणाचार्य रामरावजीमहाराज ढोक, बबनराव पाचपुते, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, अध्यक्ष संदीपानमहाराज पाटील हासेगावकर आदींसह अन्य मान्यवर तसेच लाखो भाविकांची मांदियाळी उपस्थित होती. मुख्यमंत्री म्हणाले, आळंदीत अशुद्ध पाण्याचा भाविकांना सामना करावा लागत आहे. आळंदी व पिंपरी-चिंचवडमधील समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे पुण्य आमच्या वाट्याला यावे, म्हणूनच या दोन्ही ठिकाणची सत्ता नागरिकांनी भाजपाकडे सुपूर्त केली आहे. तेव्हा पिंपरीतील पाप इकडे येऊ नये याची काळजी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांनी घ्यावी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘१३व्या शतकापासूनच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी संपूर्ण जगाच्या कल्याणाचा शाश्वत विचार करून जागतिकीकरणाची नांदी समोर मांडली होती. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र घडत आहे.’’ रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी प्रास्ताविक केले. संदीपानमहाराज पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर) निर्णय : जागेवर आरक्षण राहणार नाहीआळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या जागेवर टाकलेले आरक्षण काढण्यासंदर्भात आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या जागेवर कोणतेही आरक्षण राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एक कोटीची देणगी ‘फीविना विद्यार्थी व पगाराविना शिक्षक’ असे सूत्र असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी राज्य सरकार सदैव तत्पर असल्याचे सांगून राज्य सरकारच्या वतीने १ कोटी रुपयांची देणगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. समाजात शिक्षणाचा व्यापार होऊ लागला आहे. मात्र, मागील शंभर वर्षांत वारकरी शिक्षण संस्थेने विनामोबदला चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे. परिणामी, समाजात स्वच्छ परिवर्तनाची लाट निर्माण होऊ लागली आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक