शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पिंपरी-चिंचवडचे पाप आळंदीत नको

By admin | Updated: March 28, 2017 02:24 IST

पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट

शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडची घाण इंद्रायणी नदीत जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आळंदी देवाची येथे आयोजित स्वानंद सुखानिवासी सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारुतीमहाराज कुरेकर, आमदार संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार उल्हास पवार, महापौर नितीन काळजे, रामायणाचार्य रामरावजीमहाराज ढोक, बबनराव पाचपुते, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, अध्यक्ष संदीपानमहाराज पाटील हासेगावकर आदींसह अन्य मान्यवर तसेच लाखो भाविकांची मांदियाळी उपस्थित होती. मुख्यमंत्री म्हणाले, आळंदीत अशुद्ध पाण्याचा भाविकांना सामना करावा लागत आहे. आळंदी व पिंपरी-चिंचवडमधील समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे पुण्य आमच्या वाट्याला यावे, म्हणूनच या दोन्ही ठिकाणची सत्ता नागरिकांनी भाजपाकडे सुपूर्त केली आहे. तेव्हा पिंपरीतील पाप इकडे येऊ नये याची काळजी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांनी घ्यावी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘१३व्या शतकापासूनच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी संपूर्ण जगाच्या कल्याणाचा शाश्वत विचार करून जागतिकीकरणाची नांदी समोर मांडली होती. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र घडत आहे.’’ रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी प्रास्ताविक केले. संदीपानमहाराज पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर) निर्णय : जागेवर आरक्षण राहणार नाहीआळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या जागेवर टाकलेले आरक्षण काढण्यासंदर्भात आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या जागेवर कोणतेही आरक्षण राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एक कोटीची देणगी ‘फीविना विद्यार्थी व पगाराविना शिक्षक’ असे सूत्र असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी राज्य सरकार सदैव तत्पर असल्याचे सांगून राज्य सरकारच्या वतीने १ कोटी रुपयांची देणगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. समाजात शिक्षणाचा व्यापार होऊ लागला आहे. मात्र, मागील शंभर वर्षांत वारकरी शिक्षण संस्थेने विनामोबदला चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे. परिणामी, समाजात स्वच्छ परिवर्तनाची लाट निर्माण होऊ लागली आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक