शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आयटीनगरीतही पोहचले संपाचे लोण

By admin | Updated: June 3, 2017 02:26 IST

राज्यातील शेतकरी संपावर गेला असून, आज त्याचा दुसरा दिवस आहे. या संपाची दाहकता आता जाणवू लागली असून शहरालगतच्या

 हिंजवडी : राज्यातील शेतकरी संपावर गेला असून, आज त्याचा दुसरा दिवस आहे. या संपाची दाहकता आता जाणवू लागली असून शहरालगतच्या परिसरात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. शेतकऱ्यांनी या संपला पाठिंबा दिला असून, सोशल मीडियावर सध्या संपला साथ देणाऱ्या अनेक पोस्ट टाकण्यात येत आहेत. परिसरात काही भाजीविक्रेते भाववाढ करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातून शहराला मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवला जात असतो. संपामुळे या परिसरातूनही भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे. २ हिंजवडी परिसरात मनमानी पद्धतीने भाज्यांच्या किमती भाजीवाले ठरवत आहेत. अनेकदा सडलेला भाजीपाला विकला जातो, हिंजवडी चौकात बसणारे भाजीविक्रेते यामध्ये आघाडीवर आहेत. शेतकरी वर्गात मात्र या संपाबाबत कमालीची उत्सुकता आहे. सरकारच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष असून, यासंबंधी सर्व बातम्यांवर शेतकरी लक्ष ठेवून आहेत. खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीस वेग आला असून, त्याची तयारी शेतकरी करीत आहेत. परंतु या संपाकडेही शेतकरी ओढला जात आहे. ३राज्यातील इतर भागात दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले; परंतु परिसरात असे प्रकार घडले नाहीत. परंतु शेतकऱ्यांचे या संपाला समर्थन असून, पाठिंबा देखील आहे. अनेक शेतकऱ्यांशी या वेळी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, शेती मशागतीच्या कामास सध्या कमी कालावधी राहिला आहे. शेतकरी संपात सहभाग म्हणून आपला शेतमाल बाजारात पाठवत नाही. तर पुढील काळात आषाढी वारी देखील सुरू होणार असून, वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. यामुळे शेतीच्या कामात अधिक खंड पडू नये यासाठी रस्त्यावर उतरून संपात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. सोशल मीडियावर वाढता प्रतिसाद मागील काळातील सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, तसेच फडणवीस सरकारदेखील कर्जमाफी करताना दिसत नाही. यामुळे शेतकरी थेट संपावर बसला आहे. आजच्या काळात यावर सोशल मीडियावर चर्चा झाली नाही तर नवलच..... आज संपाचा दुसरा दिवस असल्यामुळे आणि विविध वाहिन्यांवर दोन दिवसांपासून यावर चर्चा सुरु असल्याने अनेक सोशल मीडिया प्रेमींनी या संपला आपला पाठिंबा दर्शवला. अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे स्टेटस स्वयंस्फूर्तीने बदलले. शेतकरी, शेतकऱ्यांची मुले यांनी यासाठी काही दिवस आधी ाासूनच पोस्ट टाकून वातावरण निर्मिती केली होती. फेसबुकवरदेखील अनेक विचारवंतांनी आपली मते मंडली सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने मिळालेल्या पोस्टला आज मात्र शेतकरी समर्थकांनी जोरदार हल्ला चढवला.दूध शितकरण केंद्रावर शुकशुकाटकामशेत : नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ मर्यादित दूध शितकरण केंद्रावर शुक्रवारी सकाळपासूनच शुकशुकाट होता. या केंद्रावर नाणे, अंदर, पवन मावळासह आजूबाजूच्या गावांमधील सुमारे दोनशे शेतकरी, तीस संस्था व २८ दूध डेअरी यांचे सुमारे सहा ते आठ हजार लिटर दूध संकलित होत असते. पण, राज्यातील शेतकरी संपावर गेल्याने हे दूध शितकरण केंद्र सध्या बंद झाले आहे. नेहमीच वाहन व शेतकऱ्यांची वर्दळ असणाऱ्या या केंद्रावर शुकशुकाट होता. दूध शितकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी बसून होते. दूध केंद्रावर दूध घेऊन येताना संतप्त आंदोलनकर्त्यांनी दुधाचे नुकसान करू नये किंवा इतर अनुचित प्रकार घडू नये. केंद्रावर दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रावर दूध न आणता किंवा फेकून न देता घरीच दुधाचे विविध पदार्थ बनवावे व ते आपल्या मुलाबाळांना खायला घालावे, असे आवाहन दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब नेवाळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.बोपखेलमध्ये भाजी मंडई बंदबोपखेल : येथील भाजी मंडई सकाळपासूनच बंद होती. त्यामुळे येथील गृहिनींना भाजी पाल्यासाठी वाट पहावी लागली. गणेशनगर भागातील मंडई सकाळपासून बंद होती. कारण मार्केटला भाजीपाला नसल्याने भाजी विक्रेते रिकाम्या हातांनी आले व काही ठिकाणी भाजीपाला उपलब्ध होता. परंतु, दर अव्वाच्या सव्वा असल्याने भाजी विक्रेत्यांनी मंडई बंद ठेवनेच पसंत केले. मार्केटमध्ये भाजीपाला उपलब्ध नसल्याने आम्ही आज मंडई लावू शकलो नाही. त्यामुळे आमचेही नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे आम्हाला वाटते़ नाहीतर सामान्य जनतेला उपाशी रहावे लागेल असे भाजी विक्रेते संतोष कंधारे यांनी सांगितले. भाजीपाला आणण्यासाठी चऱ्होली, चाकण मार्केटला गेलो असता तेथे माल नव्हता, तर काही तुरळक ठिकाणी भाजीपाला होता़ मात्र, दलालाकडून लूटमार सुरू होती. अव्वाच्या सवा दरात भाजीपाला विकला जात होता. त्यामुळे भाजीपाला खरेदी केला नाही व आज दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, असे भाजी विक्रेते चंद्रकांत भोसले म्हणाले.