शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

समाजवादाचे तत्त्वज्ञान संपणार नाही : डॉ. राजा दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST

पुणे : काही काळापुरती केवळ समाजवादाच्या चळवळीला मरगळ आली म्हणून समाजवादाचे तत्त्वज्ञान संपणार नाही. इतिहास आपल्याला आशावादी बनवतो. निराशेचे ...

पुणे : काही काळापुरती केवळ समाजवादाच्या चळवळीला मरगळ आली म्हणून समाजवादाचे तत्त्वज्ञान संपणार नाही. इतिहास आपल्याला आशावादी बनवतो. निराशेचे कालखंड येतात. ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून पाहिले तर वर्तमान आशावादी वाटत राहातो. निराशेचा काळ आला म्हणून ती मूल्ये, ती तत्त्वे निरर्थक ठरत नाही. ही मूल्ये शाश्वत तत्त्वानुसार काळाच्या कसोटीवर खरी उतरतात आणि त्या चळवळीला पुन्हा एकदा बहर येतो. समग्र विचार करणारी भाईंची ही समाजवादी चळवळ आहे, असे विचार राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी मांडले.

लोकनेते भाई वैद्य यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त प्राचार्या नलिनी वैद्य समाजभिमुख शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथील रावसाहेब पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या वृंदा हजारे यांना आणि लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार सोशलिस्ट पार्टी इंडियाचे महामंत्री गौतम प्रितम यांना राज्य डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अनुक्रमे रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह आणि रुपये पंधरा हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेना आणि भाई वैद्य फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य तसेच अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे प्रा. डॉ. शरद जावडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर भाई वैद्य यांच्या शैक्षणिक भाषणांचे व लेखांचे संकलन असलेल्या ‘समाजवादी शिक्षण हक्कासाठी लढा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रबोधन आणि परिवर्तन हे भाई वैद्य यांच्या कार्याची द्विसूत्री होती. ज्ञानप्रक्रियेचे लोकशाहीकरण व्हावे, हा भाईंचा मूळ गाभा होता. माझीही मूळ प्रेरणा तीच असल्याने विश्वकोश निर्मिती प्रक्रियेद्वारे खेडोपाडी आणि आदिवासींपर्यंत ही ज्ञानगंगा कशी पोहोचेल या दृष्टीने राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी जबाबदारी निभावेल, असा विश्वास डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.

डॉ. शरद जावडेकर म्हणाले, जागतिकीकरणाचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला होता. भाईंनी दाखवलेल्या दिशेमुळे समाजवादी चळवळ आजही तग धरून उभी आहे.

पुरस्कारार्थी गौतम प्रीतम हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. प्रा. प्रमोद दळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

------------------------------------------------------------------------

चौकट

अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केलेले ‘लॉकडाऊन’ कधी उठणार?

कोरोनाचे लॉकडाऊन कधी ना कधी तरी संपुष्टात येईल. पण मोदी सरकार आणि त्यांच्या पिलावळीने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ‘लॉकडाऊन’ केले आहे. ते कधी उठणार? हा खरा प्रश्न आहे,.. अशा शब्दांत डॉ. अभिजित वैद्य यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

--------------------------------------