शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

पीएच.डी. पदवीसुद्धा झाली किमान पात्रता

By admin | Updated: February 15, 2017 02:00 IST

‘‘यापूर्वी पदवीला मोठे महत्त्व होते, पण काळानुसार आज पीएचडी ही पदवीसुद्धा किमान पात्रता झाली आहे,’’ असे मत डॉ. भालचंद्र मुणगेकर

निगडी : ‘‘यापूर्वी पदवीला मोठे महत्त्व होते, पण काळानुसार आज पीएचडी ही पदवीसुद्धा किमान पात्रता झाली आहे,’’ असे मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयात संपूर्ण संस्थेतील 12 महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी माजी राज्यसभा सदस्य, नियोजन आयोग सदस्य आणि अर्थतज्ज्ञ मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षपद संस्थेचे मानद सचिव संदीप कदम यांनी भूषविले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घाडगे, मोहनराव देशमुख, श्री. पी. ई. कुलकर्णी, ए. एम. जाधव, डॉ. मनोहर चासकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, संस्थेच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, परिक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. मुणगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाला सुरूवात झाली. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी संस्थेच्या 12 महाविद्यालयांचा हा समारंभ असून, यामध्ये एकूण 1533 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुणगेकर यांचा परिचय इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मंजूषा धुमाळ यांनी करून दिला.डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘ आपल्या देशात पदवी आणि नोकरी याचा जवळचा संबंध असून पदवी घेतलेल्या तरूणांना नोकरी पुरविणे ही आजची गरज आहे. जर त्यांना रोजगार पुरविला गेला नाही तर ही लोकसंख्या आपत्ती ठरेल. रोजगाराची क्षमता असणे आणि रोजगार मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.’’ (वार्ताहर)