शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कपातीविरोधात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 04:04 IST

कंपन्यांनी या काळामध्ये कामगार कपात केल्यास, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधातील ती कृती ठरेल.

पुणे : लॉकडाऊन वाढल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह काही खासगी कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याबरोबरच वेतन रोखल्याच्या तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कंपन्यांनी या काळामध्ये कामगार कपात केल्यास, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधातील ती कृती ठरेल. तसेच, ही कपात घटनाविरोधी देखील आहे. त्या विरोधात नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्पलॉईज सेनेने (एनआयटीइएस) सर्वोच्च न्यायालयामधे जनहित याचिका दाखल केली आहे. कोरोनाचा (कोविड-१९) प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे; मात्र या काळामध्ये उद्योगांसाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाने अनेक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी देखील त्याबाबत अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार कंपन्यांना या काळामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढता येणार नाही. तसेच, त्यांच्या वेतनात देखील कपात करता येणार नाही. मात्र, अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना या काळामधे वाºयावर सोडले आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्या (आयटी), बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ), नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग (केपीओ) अशा विविध कंपन्यांचा यात समावेश आहे.कामगार कपात, वेतन रोखणे यामुळे अनेक कर्मचाºयांना घराचे मासिक भाडे, बँकांचे हप्ते आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता लागली आहे.कोणत्याही कामगाराचा रोजगार हिरावून घेणे, वेतन कपात करणे अथवा वेतन रोखणे बेकायदेशीर आहे. लॉकडाऊन काळात केंद्र आणि राज्यसरकारने घेतल्या निर्णयाविरोधातील हे वर्तन आहे. काही कंपन्या तर केवळ कर्मचाºयांना फोनवरुन कामावरुन कमी केल्याचे सांगत आहेत. त्यासाठी साधी नोटीसही कर्मचाºयांना दिली जात नाही. या बेकायदेशीर कृत्या विरोधात अ‍ॅड. राजेश इनामदार यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे महासचिव तथा महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी सांगितले.