शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

कामगार कपातीविरोधात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 04:04 IST

कंपन्यांनी या काळामध्ये कामगार कपात केल्यास, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधातील ती कृती ठरेल.

पुणे : लॉकडाऊन वाढल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह काही खासगी कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याबरोबरच वेतन रोखल्याच्या तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कंपन्यांनी या काळामध्ये कामगार कपात केल्यास, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधातील ती कृती ठरेल. तसेच, ही कपात घटनाविरोधी देखील आहे. त्या विरोधात नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्पलॉईज सेनेने (एनआयटीइएस) सर्वोच्च न्यायालयामधे जनहित याचिका दाखल केली आहे. कोरोनाचा (कोविड-१९) प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे; मात्र या काळामध्ये उद्योगांसाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाने अनेक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी देखील त्याबाबत अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार कंपन्यांना या काळामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढता येणार नाही. तसेच, त्यांच्या वेतनात देखील कपात करता येणार नाही. मात्र, अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना या काळामधे वाºयावर सोडले आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्या (आयटी), बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ), नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग (केपीओ) अशा विविध कंपन्यांचा यात समावेश आहे.कामगार कपात, वेतन रोखणे यामुळे अनेक कर्मचाºयांना घराचे मासिक भाडे, बँकांचे हप्ते आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता लागली आहे.कोणत्याही कामगाराचा रोजगार हिरावून घेणे, वेतन कपात करणे अथवा वेतन रोखणे बेकायदेशीर आहे. लॉकडाऊन काळात केंद्र आणि राज्यसरकारने घेतल्या निर्णयाविरोधातील हे वर्तन आहे. काही कंपन्या तर केवळ कर्मचाºयांना फोनवरुन कामावरुन कमी केल्याचे सांगत आहेत. त्यासाठी साधी नोटीसही कर्मचाºयांना दिली जात नाही. या बेकायदेशीर कृत्या विरोधात अ‍ॅड. राजेश इनामदार यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे महासचिव तथा महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी सांगितले.