शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी द्या!

By admin | Updated: January 6, 2016 00:47 IST

बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते;

बारामती : बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र स्थानिक भूमिपूत्रांना नोकरीत सामावून घेतले नाही. उलट परप्रांतीयांची भरती बारामती एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी संगनमताने स्थानिकांना डावलून अन्य भागातील कामगारांना नोकरीवर घेतले आहे. या विरोधात स्थानिक भूमिपूत्रांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.२० वर्षांपूर्वी बारामती एमआयडीसीसाठी रुई, तांदूळवाडी, कटफळ, जळोची, वंजारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादित करण्यात आल्या. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत समावून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांना त्याचा विसर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमआयडीसीने झटकली.या कंपन्यांमध्ये कायम कामगार भरतीत स्थानिकांना डावलले जाते. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांच्या मुलांनादेखील न्याय मिळालेला नाही. त्यामुळे परिसरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी भूसंपादन करताना कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सध्या परिसराचे नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक जीवनमानाचा दुष्परिणाम वाढत आहे. या स्थितीत येत्या ८ दिवसांत एमआयडीसीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपूत्रांना कायम नोकरीसाठी संधी द्यावी, अशी मागणी या परिसरातील तरुणांनी केली आहे. याबाबत एमआयडीसीचे मुंबईतील मुख्यालय, सर्व कंपन्या, प्रादेशिक कार्यालय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. ८ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास एमआयडीसीतील पेन्सील चौकात कोणतीही पूर्व कल्पना न देता सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली जाईल, असे वंजारवाडी गावचे उपसरपंच दादा चौधर, सदस्य केशव चौधर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)