शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमआरडीए’ला नागरिकांचा विरोध

By admin | Updated: February 7, 2016 03:37 IST

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) सामील केल्याच्या विरोधात राजगुरुनगरच्या आसपासच्या काही गावांनी न्यायालयात जाण्याचा पवित्रा आज

राजगुरुनगर : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) सामील केल्याच्या विरोधात राजगुरुनगरच्या आसपासच्या काही गावांनी न्यायालयात जाण्याचा पवित्रा आज झालेल्या एका बैठकीत घेतला.सातकरस्थळ, राक्षेवाडी, सांडभोरवाडी, कोहिनकरवाडी, काळेचीवाडी, पांगरी-बुट्टेवाडी या गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रमुख मंडळींनी राजगुरुनगर येथे एक बैठक घेतली. या बैठकीला अजय चव्हाण, अविनाश कोहिनकर, कविता पाचारणे, सोनाली सांडभोर, प्रमिला तळेकर, किशोर बागलाणे, कल्पना काळे, दिगंबर सांडभोर, सुरेखा राक्षे, सोपान घोलप, दत्तात्रय सातपुते, नानाभाऊ आरुडे, कोंडीभाऊ पाचारणे, भरत बुट्टे आदी उपस्थित होते. पीएमआरडीएत सामील करून घेताना गावांना विश्वासात घेतले नाही. गावांच्या हरकती सूचना घेतल्या नाहीत. पीएमआरडीएची कार्यपद्धती सांगितली गेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्राधिकरणात समाविष्ट झालेल्या गावांना यापुढे थेट विकास निधी मिळणार नाही. त्यामुळे गावाचा विकास करताना स्थानिकांच्या मतांना, भावनांना आणि प्रत्यक्ष परिस्थितीला काही अर्थ उरणार नाही. ग्रामपंचायतींची अवस्था असून नसल्यासारखी होईल. पीएमआरडीए म्हणेल ती पूर्व दिशा होईल. त्यांचा जो प्रादेशिक आराखडा असेल, त्याप्रमाणे कामे होतील. गावकऱ्यांच्या गरजांचा विचार होणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पीएमआरडीएमध्ये लोकांचे प्रतिनिधी नसल्याने सामन्यांचा आवाज ऐकला जाईल, असे या गावकारभाऱ्यांना वाटत नाही. एकटे पंचायत समितीचे सभापती सर्व तालुक्याची बाजू मांडू शकणार नाहीत. विकास आराखडा करताना गावांना विश्वासात घेतले जाणार नाही. एखाद्या मुद्द्याला विरोध असेल, तर त्याचा विचार होणार नाही. एकीकडे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसारखे थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्यांना या ग्रामपंचायती मुकणार आहेत. एकंदरीतच, गावांना स्वायतत्ता राहणार नाही, असे मत या बैठकीत मांडले गेले. त्यामुळे या निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीचे समन्वयक अजय चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)प्रक्रिया अवघड : शुल्काला मुकावे लागणारबांधकाम परवानग्या पीएमआरडीए देणार आहे. त्या देताना मोठा विलंब होत असल्याच्या तक्रारी आताच सुरू आहेत. समाविष्ट केलेला बहुतांश भाग अद्यापही ग्रामीण आहे. लोक पूर्णत: शिक्षित नाहीत; त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगीची प्रक्रिया करणे फार अवघड जाणार आहे. शिवाय, नियमांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची पिळवणूक केली जाईल.या प्रक्रियेत लोक भरडले जातील आणि स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहील. यापूर्वी ग्रामपंचायत परवानगी घेऊन बांधलेल्या घरांवर पीएमआरडीए कारवाई करेल किंवा त्यांच्यावर अधिक अधिभार लागेल, अशीही या लोकप्रतिनिधींना भीती आहे. बांधकाम परवानग्यांच्या शुल्काला ग्रामपंचायतींना मुकावे लागणार आहे.