शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

‘पीएमआरडीए’ला नागरिकांचा विरोध

By admin | Updated: February 7, 2016 03:37 IST

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) सामील केल्याच्या विरोधात राजगुरुनगरच्या आसपासच्या काही गावांनी न्यायालयात जाण्याचा पवित्रा आज

राजगुरुनगर : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) सामील केल्याच्या विरोधात राजगुरुनगरच्या आसपासच्या काही गावांनी न्यायालयात जाण्याचा पवित्रा आज झालेल्या एका बैठकीत घेतला.सातकरस्थळ, राक्षेवाडी, सांडभोरवाडी, कोहिनकरवाडी, काळेचीवाडी, पांगरी-बुट्टेवाडी या गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रमुख मंडळींनी राजगुरुनगर येथे एक बैठक घेतली. या बैठकीला अजय चव्हाण, अविनाश कोहिनकर, कविता पाचारणे, सोनाली सांडभोर, प्रमिला तळेकर, किशोर बागलाणे, कल्पना काळे, दिगंबर सांडभोर, सुरेखा राक्षे, सोपान घोलप, दत्तात्रय सातपुते, नानाभाऊ आरुडे, कोंडीभाऊ पाचारणे, भरत बुट्टे आदी उपस्थित होते. पीएमआरडीएत सामील करून घेताना गावांना विश्वासात घेतले नाही. गावांच्या हरकती सूचना घेतल्या नाहीत. पीएमआरडीएची कार्यपद्धती सांगितली गेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्राधिकरणात समाविष्ट झालेल्या गावांना यापुढे थेट विकास निधी मिळणार नाही. त्यामुळे गावाचा विकास करताना स्थानिकांच्या मतांना, भावनांना आणि प्रत्यक्ष परिस्थितीला काही अर्थ उरणार नाही. ग्रामपंचायतींची अवस्था असून नसल्यासारखी होईल. पीएमआरडीए म्हणेल ती पूर्व दिशा होईल. त्यांचा जो प्रादेशिक आराखडा असेल, त्याप्रमाणे कामे होतील. गावकऱ्यांच्या गरजांचा विचार होणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पीएमआरडीएमध्ये लोकांचे प्रतिनिधी नसल्याने सामन्यांचा आवाज ऐकला जाईल, असे या गावकारभाऱ्यांना वाटत नाही. एकटे पंचायत समितीचे सभापती सर्व तालुक्याची बाजू मांडू शकणार नाहीत. विकास आराखडा करताना गावांना विश्वासात घेतले जाणार नाही. एखाद्या मुद्द्याला विरोध असेल, तर त्याचा विचार होणार नाही. एकीकडे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसारखे थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्यांना या ग्रामपंचायती मुकणार आहेत. एकंदरीतच, गावांना स्वायतत्ता राहणार नाही, असे मत या बैठकीत मांडले गेले. त्यामुळे या निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीचे समन्वयक अजय चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)प्रक्रिया अवघड : शुल्काला मुकावे लागणारबांधकाम परवानग्या पीएमआरडीए देणार आहे. त्या देताना मोठा विलंब होत असल्याच्या तक्रारी आताच सुरू आहेत. समाविष्ट केलेला बहुतांश भाग अद्यापही ग्रामीण आहे. लोक पूर्णत: शिक्षित नाहीत; त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगीची प्रक्रिया करणे फार अवघड जाणार आहे. शिवाय, नियमांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची पिळवणूक केली जाईल.या प्रक्रियेत लोक भरडले जातील आणि स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहील. यापूर्वी ग्रामपंचायत परवानगी घेऊन बांधलेल्या घरांवर पीएमआरडीए कारवाई करेल किंवा त्यांच्यावर अधिक अधिभार लागेल, अशीही या लोकप्रतिनिधींना भीती आहे. बांधकाम परवानग्यांच्या शुल्काला ग्रामपंचायतींना मुकावे लागणार आहे.