शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागरिकांनीही विकासामध्ये योगदान द्यावे- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 03:17 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

पुणे : प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ घेऊन शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदनावर आयोजित ध्वजवंदन समारंभानंतर बापट बोलत होते. कार्यक्रमास पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार नीलम गोºहे, आमदार माधुरी मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशिनचा वापर झाल्यामुळे गरिबांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर धान्य मिळत असून त्यामुळे केरोसीनची बचत झाली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडणी मिळाल्यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी गॅसवरील सबसिडी सोडून दिली आहे. मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकºयांना फायदा झाला आहे.पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांना जाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्य पारितोषिके पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. या वेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, एनसीसी व अग्निशमन दलाने संचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शनिवारवाड्यावर ध्वजवंदनजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारवाड्यावर ध्वजवंदन केले. या वेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उत्तम पाटील, रामदास जगताप आदी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उत्तम चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्या सभोवताली असलेल्या भागाचा पीएमआरडीएतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसराचा विकास होणार असून हा भाग इकोनॉमिकल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन बापट यांनी केले. तसेच २६ जानेवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवाडा साजरा केला जात असून मतदारांनी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन बापट यांनी या वेळी केले.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनgirish bapatगिरीष बापट