शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकप्रतिनिधींची गावेही स्वच्छतेसाठी उदासीन

By admin | Updated: May 20, 2015 23:11 IST

आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे

इंदापूर : आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गावांमधील स्थितीही समाधानकारक नाही. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी गावातील कुटुंबांची संख्या ७९६ आहे. त्यापैकी ४०० कुटुंबांना स्वच्छतागृहे नाहीत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातील कुटुंब संख्या २८०९ आहे. त्या पैकी १९०२ कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत.‘स्वच्छ भारत अभियाना’च्या मंगळवारी (दि. १९ मे) मिळालेल्या आकडेवारीनुसार , तालुक्यातील एकूण ११३ ग्रामपंचायतींच्या हद्दीत राहणाऱ्या ६० हजार ८५४ कुटुंबांपैकी २८ हजार ६२७ कुटुंबांकडे स्वच्छतागृहे आहे, तर ३२ हजार २२७ सत्तावीस कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.याबाबत ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण तालुका हगणदारीमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पन्नास लाख रुपयांचे अनुदान तालुक्यास मिळाले आहे. शौचालय बांधणाऱ्या कुटुंबास बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीनशे कुटुंबांची स्वच्छतागृहांची मागणी आली आहे. आम्ही गावनिहाय प्रस्ताव एकत्र करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक महिन्याला तीन हजार या प्रमाणे शौचालय उभारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आकडेवारीत फरक (कंसात पंचायत समितीचा आकडा)एकूण गावे :११३कुटुंब संख्या : ६२३६१ (६0,८५४)शौचालये आहेत : ३५७0९ (२८,६२७)शौचालये नाहीत : २६६५२ (३२,२२७)