शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

‘लोकमत’मुळे गाव पुन्हा आठवलं!

By admin | Updated: July 31, 2015 03:49 IST

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले.

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी मदत देऊन माळीणचे पुनर्वसन वर्षात करून दाखवू, अशा घोषणा केल्या. परंतु सुरुवातीचे दोन महिनेच तो टिकला. आजचे माळीण म्हणजे तिथे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. गावकरी पत्र्याच्या शेडमध्ये कसेबसे जगत आहेत. त्या गावाच्या अस्तित्वाच्या खुणा फक्त दिसत राहतात. जगण्याचा संघर्ष मात्र अजूनही संपलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरानंतर जागेवरच अडलेला आहे. अंशत: बाधीत कुटुंबीयांची यात मोठी परवड सुरू आहे. मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना अपघात विमा अद्याप मिळालाच नाही....आदी विषय गेल्या आठ दिवसांपासून ‘लोकमत’ने मांडले. याबरोबरच आतापर्यंत माळीणसाठी झालेल्या चांगल्या कामांचे कौतुकही ‘लोकमत’ने केले. यात प्रशासनाने दिलेला २३ कोटींचा निधी असो की माळीण गावावर जी आपत्ती आली, त्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. परंतु, त्यातील अनेक जण असे होते, जे अतिशय चांगले काम करूनही वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात फारसे आले नाहीत. अशा लोकांनी पडद्यामागेच राहून आपले कर्तव्य पार पाडले. माणुसकीच्या भावनेतून प्रत्यक्ष मदतकार्यात उतरलेल्या व नंतरही मदतीचा हात देणाऱ्या लोकांची दखल घेतली.आज माळीण दुर्घटनेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दुर्घटनाग्रस्त माळीण गावात आयोजित केला होता. या ठिकाणी मृत लोकांचे कुटुंबीय, तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी, नातेवाईक जमले होते. त्यांनी ‘लोकमत’ने मांडलेल्या या सर्व विषयांचे कौतुक केले. तसेच, अशंत: बाधित कुटुंबीयांनाही कायमस्वरूपी पुनर्वसनात त्यांना घरे दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रखडलेल्या विमा योजनेचे चेक तातडीने त्या विद्यार्थ्यांच्या वारसांना सुपूर्त केले. (वार्ताहर)