शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे गाव पुन्हा आठवलं!

By admin | Updated: July 31, 2015 03:49 IST

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले.

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी मदत देऊन माळीणचे पुनर्वसन वर्षात करून दाखवू, अशा घोषणा केल्या. परंतु सुरुवातीचे दोन महिनेच तो टिकला. आजचे माळीण म्हणजे तिथे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. गावकरी पत्र्याच्या शेडमध्ये कसेबसे जगत आहेत. त्या गावाच्या अस्तित्वाच्या खुणा फक्त दिसत राहतात. जगण्याचा संघर्ष मात्र अजूनही संपलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरानंतर जागेवरच अडलेला आहे. अंशत: बाधीत कुटुंबीयांची यात मोठी परवड सुरू आहे. मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना अपघात विमा अद्याप मिळालाच नाही....आदी विषय गेल्या आठ दिवसांपासून ‘लोकमत’ने मांडले. याबरोबरच आतापर्यंत माळीणसाठी झालेल्या चांगल्या कामांचे कौतुकही ‘लोकमत’ने केले. यात प्रशासनाने दिलेला २३ कोटींचा निधी असो की माळीण गावावर जी आपत्ती आली, त्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. परंतु, त्यातील अनेक जण असे होते, जे अतिशय चांगले काम करूनही वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात फारसे आले नाहीत. अशा लोकांनी पडद्यामागेच राहून आपले कर्तव्य पार पाडले. माणुसकीच्या भावनेतून प्रत्यक्ष मदतकार्यात उतरलेल्या व नंतरही मदतीचा हात देणाऱ्या लोकांची दखल घेतली.आज माळीण दुर्घटनेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दुर्घटनाग्रस्त माळीण गावात आयोजित केला होता. या ठिकाणी मृत लोकांचे कुटुंबीय, तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी, नातेवाईक जमले होते. त्यांनी ‘लोकमत’ने मांडलेल्या या सर्व विषयांचे कौतुक केले. तसेच, अशंत: बाधित कुटुंबीयांनाही कायमस्वरूपी पुनर्वसनात त्यांना घरे दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रखडलेल्या विमा योजनेचे चेक तातडीने त्या विद्यार्थ्यांच्या वारसांना सुपूर्त केले. (वार्ताहर)