शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

‘लोकमत’मुळे गाव पुन्हा आठवलं!

By admin | Updated: July 31, 2015 03:49 IST

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले.

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी मदत देऊन माळीणचे पुनर्वसन वर्षात करून दाखवू, अशा घोषणा केल्या. परंतु सुरुवातीचे दोन महिनेच तो टिकला. आजचे माळीण म्हणजे तिथे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. गावकरी पत्र्याच्या शेडमध्ये कसेबसे जगत आहेत. त्या गावाच्या अस्तित्वाच्या खुणा फक्त दिसत राहतात. जगण्याचा संघर्ष मात्र अजूनही संपलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरानंतर जागेवरच अडलेला आहे. अंशत: बाधीत कुटुंबीयांची यात मोठी परवड सुरू आहे. मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना अपघात विमा अद्याप मिळालाच नाही....आदी विषय गेल्या आठ दिवसांपासून ‘लोकमत’ने मांडले. याबरोबरच आतापर्यंत माळीणसाठी झालेल्या चांगल्या कामांचे कौतुकही ‘लोकमत’ने केले. यात प्रशासनाने दिलेला २३ कोटींचा निधी असो की माळीण गावावर जी आपत्ती आली, त्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. परंतु, त्यातील अनेक जण असे होते, जे अतिशय चांगले काम करूनही वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात फारसे आले नाहीत. अशा लोकांनी पडद्यामागेच राहून आपले कर्तव्य पार पाडले. माणुसकीच्या भावनेतून प्रत्यक्ष मदतकार्यात उतरलेल्या व नंतरही मदतीचा हात देणाऱ्या लोकांची दखल घेतली.आज माळीण दुर्घटनेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दुर्घटनाग्रस्त माळीण गावात आयोजित केला होता. या ठिकाणी मृत लोकांचे कुटुंबीय, तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी, नातेवाईक जमले होते. त्यांनी ‘लोकमत’ने मांडलेल्या या सर्व विषयांचे कौतुक केले. तसेच, अशंत: बाधित कुटुंबीयांनाही कायमस्वरूपी पुनर्वसनात त्यांना घरे दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रखडलेल्या विमा योजनेचे चेक तातडीने त्या विद्यार्थ्यांच्या वारसांना सुपूर्त केले. (वार्ताहर)