शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रदूषण रोखण्यासाठी वाढतोय लोकसहभाग

By admin | Updated: May 29, 2017 02:30 IST

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायी असणाऱ्या पवना नदीचा श्वास गुदमरतोय. तिची होणारी दुरवस्था रोखण्यासाठी आता चिंचवडकर पुढे सरसावत

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायी असणाऱ्या पवना नदीचा श्वास गुदमरतोय. तिची होणारी दुरवस्था रोखण्यासाठी आता चिंचवडकर पुढे सरसावत आहे. यापुढे आपले कर्तव्य समजून नदीचे पावित्र्य राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नदीपात्रातील राडारोडा, प्लॅस्टिक, कचरा, जलपर्णी काढण्यासाठी लोकसहभाग मिळत आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून नदीचे प्रदूषण रोखल्यास पवनामाईचे बदलते रूप निश्चितच सुखदायी होईल ही भावना चिंचवडकरांच्या मनात रुजत आहे.शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची लांबी जवळपास २५ कि.मी आहे.२०० फूट पात्राची रुंदी असणारी ही नदी प्रदूषणा च्या विळाख्यात सापडली आहे. याबाबत वारंवार चर्चा होते. मात्र, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा ही मुख्य समस्या आहे. याचाच विचार करून चिंचवडकरांनी पावनामाई स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणे सुरू केले आहे.‘संकल्प पवनामायी स्वच्छतेचा, उचलुया वाटा खारीचा’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्य सुरू केले ही आनंदाची बाब आहे.पर्यावरण रक्षण : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादथेरगाव पुलाजवळील सुमारे दीडशे ट्रक गाळ काढण्यात आला असून, नदी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. प्रत्येक चतुर्थीला पवना नदीची आरती केली जाते. या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. निर्माल्य, कचरा, प्लॅस्टिक नदी पात्रात टाकू नये यासाठी जनजागृती सुरू केली आहे. नदी पात्रालागत असणाऱ्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून प्रत्येक नागरिकाने एक झाड दत्तक घेऊन त्याची निगा राखावी यासाठी काम सुरू आहे.नियोजन महत्त्वाचेपवना नदीचे वाढते प्रदूषण हा चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, फक्त चर्चेतून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नदी पात्राची स्वच्छता करून रुंदी व खोली वाढविणे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काळेवाडी पुलाखाली नदी पात्रात असणारा राडारोडा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून नदीपात्राची साफसफाई करण्याचे नियोजन आहे.- राजेंद्र गावडे (नगरसेवक)नागरिकांचे सहकार्य हवेपवना नदीचे वाढते प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती करून तिचे संरक्षण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, प्लॅस्टिक, निर्माल्य यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. निर्माल्य कुंडाचा वापर होणे महत्त्वाचे आहे. लोक सहभागातून नदीची साफसफाई करणे सुरू आहे. नागरिकांनी पुढे येणे ही खरी गरज आहे.- अश्विनी चिंचवडे (नगरसेविका)