शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

प्रदूषण रोखण्यासाठी वाढतोय लोकसहभाग

By admin | Updated: May 29, 2017 02:30 IST

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायी असणाऱ्या पवना नदीचा श्वास गुदमरतोय. तिची होणारी दुरवस्था रोखण्यासाठी आता चिंचवडकर पुढे सरसावत

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायी असणाऱ्या पवना नदीचा श्वास गुदमरतोय. तिची होणारी दुरवस्था रोखण्यासाठी आता चिंचवडकर पुढे सरसावत आहे. यापुढे आपले कर्तव्य समजून नदीचे पावित्र्य राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नदीपात्रातील राडारोडा, प्लॅस्टिक, कचरा, जलपर्णी काढण्यासाठी लोकसहभाग मिळत आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून नदीचे प्रदूषण रोखल्यास पवनामाईचे बदलते रूप निश्चितच सुखदायी होईल ही भावना चिंचवडकरांच्या मनात रुजत आहे.शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची लांबी जवळपास २५ कि.मी आहे.२०० फूट पात्राची रुंदी असणारी ही नदी प्रदूषणा च्या विळाख्यात सापडली आहे. याबाबत वारंवार चर्चा होते. मात्र, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा ही मुख्य समस्या आहे. याचाच विचार करून चिंचवडकरांनी पावनामाई स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणे सुरू केले आहे.‘संकल्प पवनामायी स्वच्छतेचा, उचलुया वाटा खारीचा’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्य सुरू केले ही आनंदाची बाब आहे.पर्यावरण रक्षण : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादथेरगाव पुलाजवळील सुमारे दीडशे ट्रक गाळ काढण्यात आला असून, नदी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. प्रत्येक चतुर्थीला पवना नदीची आरती केली जाते. या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. निर्माल्य, कचरा, प्लॅस्टिक नदी पात्रात टाकू नये यासाठी जनजागृती सुरू केली आहे. नदी पात्रालागत असणाऱ्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून प्रत्येक नागरिकाने एक झाड दत्तक घेऊन त्याची निगा राखावी यासाठी काम सुरू आहे.नियोजन महत्त्वाचेपवना नदीचे वाढते प्रदूषण हा चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, फक्त चर्चेतून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नदी पात्राची स्वच्छता करून रुंदी व खोली वाढविणे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काळेवाडी पुलाखाली नदी पात्रात असणारा राडारोडा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून नदीपात्राची साफसफाई करण्याचे नियोजन आहे.- राजेंद्र गावडे (नगरसेवक)नागरिकांचे सहकार्य हवेपवना नदीचे वाढते प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती करून तिचे संरक्षण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, प्लॅस्टिक, निर्माल्य यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. निर्माल्य कुंडाचा वापर होणे महत्त्वाचे आहे. लोक सहभागातून नदीची साफसफाई करणे सुरू आहे. नागरिकांनी पुढे येणे ही खरी गरज आहे.- अश्विनी चिंचवडे (नगरसेविका)