शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कोंढरीतील लोकांचे प्रशासनाने केले सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST

भोर : भोर तालुक्यातील भूस्खलन झालेल्या कोंढरी गावातील लोकांना कोणताही धोका होऊ नये म्हणून भोर प्रशासनाने शाळा अंगणवाडी व ...

भोर :

भोर तालुक्यातील भूस्खलन झालेल्या कोंढरी गावातील लोकांना कोणताही धोका होऊ नये म्हणून भोर प्रशासनाने शाळा अंगणवाडी व नातेवाईकांकडे सुरक्षित ठिकाणी हालवले आहे. मात्र तात्पुरते निवारा शेड किंवा चांगल्या ठिकाणी पुनर्वसन केले जात नाही फक्त पावसाळा आला की दरवर्षी प्रशासनाला कोंढरी गावाची आठवण होते. एकतर आमचे पुनर्वसन करा, अन्यथा आम्हाला पावसात मुलाबाळांना घेऊन इकडेतिकडे फिरण्यापेक्षा गावातच मरू द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया कोंढरी गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

२०१९ साली भोर महाड रस्त्यावरील कोंढरी गावाच्या वरती असलेल्या डोंगरात पावसाचे पाणी जाऊन भूस्खलन होऊन घरांजवळ आले होते. त्यामुळे गावातील लोकांना गावातीलच प्राथमिक शाळा अंगणवाडीत तर काही जण आपआपल्या नातेवाईकांकडे सुरक्षित ठिकाणी राहिले होते. पावसाळा संपल्यावर पुन्हा गावकरी गावात राहायला जातात. मागील दोन वर्षांत पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.मात्र ना निवारा शेड मिळाली ना पुनर्वसन झाले. दोन वर्षांपासून जैसे थे परिस्थिती असाल्याचे कोंढरी गावातील नागरिक प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत आहेत.

सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून कोंढरी गावाला धोका होऊ नये म्हणून मागील चार दिवसांपासून प्रशासनाने कोंढरी गावातील ४० कुटुंबांतील १६३ लोकांना प्राथमिक शाळेत सुरक्षित ठिकाणी आणले आहे. यातील काही जण आपल्या नातेवाईकांकडे राहात आहेत. प्रशासनाने गावातील लोकांची जेवणाची सुविधा करुन दिली आहेत. मात्र दरवेळी पावसाळ्यात गावाबाहेर राहायला जायचे आणि पावसाळा संपला की पुन्हा गावात जायचे हे ठरलेले आहे. शासन यावर काहीच तोडगा काढत नाही.

दरम्यान, कोंढरी गावातील भूस्खलन झालेल्या डोंगराची पाहणी जिल्हाधिकाऱ्यासह सर्व अधिकाऱ्यांनी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. कोंढरी गाव नीरा देवघर धरणात बुडीत क्षेत्रात गेले होते. त्या वेळी पुनर्वसन झालेले होते. नवीन पुनर्वसन होत नाही. मात्र नव्याने कोंढरी गावाचे पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा, पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांनी दिले होते.

- दरवर्षी पावसाळ्यात लोकांची प्रशासनाला आठवण

सन २०१९ साली कोंढरी गावातील डोंगरात भूस्खलन होऊन डोंगरच खाली आला होता. त्या वेळी गाव धोकादायक झाल्याने गावातील लोकांचे जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते. त्यावेळी पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे, खासदार, आमदार सर्वानी भेटी देऊन पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षांत ना तात्पुरती निवारा शेड ना पुनर्वसन ना सुरक्षित ठिकाणी हालवले होते. या वेळी सर्वत्र भूस्खलन होऊन डोंगर खाली येत असल्याने येथील लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. माञ दरवेळी पावसाळा आला की प्रशासनाला येथील लोकांची आठवण होते.पावसाळा संपला की सर्वजण विसरुन जातात. लोकांना वाऱ्यावर सोडले जाते, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील येथील भिवबा पारठे व नागरिक यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, म्हसर बुदुकची डोईफोडेवास्ती येथील तीन कुटुंबांतील १८ लोकांनाही प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी आणून सोयीसुविधा पुरवल्या आहेत. तर हिर्डोशी गावातील मालुसरेवस्ती येथील १४ कुटुंबांतील ४५ लोकांनाही धोका होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी आणले, तर अनेकजन नातेवाईकांकडे राहात आहेत.

कोंढरी गावातील नागरिक शाळेत एकत्र जेवण करताना.