शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 3, 2016 01:29 IST

चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत

पिंपरी : चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अगोदरच नियमितपणे पाणीपुरवठा होत नसताना बिलेही चुकीची येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. चुकीच्या बिलांमुळे फुगवटा वाढल्याने थकबाकी वसुलीत पाणीपुरवठा विभागास अपयश आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पाणीकपातीबाबत याच आठवड्यात बैठक होणार आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी पवना नदीद्वारे रावेत येथील बंधाऱ्यांवरून उचलून शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने दिवसातून एकवेळ पाणी पुरवठ्याचे नियोजन केले. त्यानुसार शहरात एकवेळ पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने पाटबंधारे विभागाने तातडीची बैठक घ्यावी, अशी सूचना पालिकेला केली आहे.पाणीपुरवठा नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घ्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पाणीपुरवठा अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक या आठवड्यात होणार आहे. चर्चेनंतर पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एक वेळ पाणीपुरवठ्याचे धोरण जाहीर करतानाच बांधकामासाठी वापरणाऱ्यांवर कारवाई करू. बिले न भरणारांचे नळजोड तोडू, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, यापैकी कोणतीही कारवाई विभागाने केलेली नाही. २०१४-१५ या वर्षात पाणीपट्टी आणि इतर वसुलीतून ६० कोटींचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागासमोर होते. मात्र, त्यांपैकी केवळ ३२ कोटींची वसुली झाली होती. २०१५-१६ या वर्षांसाठी ६५ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यात कपात करून ५६ कोटी करण्यात आले. मात्र, आजपर्यंत २५ कोटींची वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)