शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 3, 2016 01:29 IST

चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत

पिंपरी : चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अगोदरच नियमितपणे पाणीपुरवठा होत नसताना बिलेही चुकीची येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. चुकीच्या बिलांमुळे फुगवटा वाढल्याने थकबाकी वसुलीत पाणीपुरवठा विभागास अपयश आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पाणीकपातीबाबत याच आठवड्यात बैठक होणार आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी पवना नदीद्वारे रावेत येथील बंधाऱ्यांवरून उचलून शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने दिवसातून एकवेळ पाणी पुरवठ्याचे नियोजन केले. त्यानुसार शहरात एकवेळ पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने पाटबंधारे विभागाने तातडीची बैठक घ्यावी, अशी सूचना पालिकेला केली आहे.पाणीपुरवठा नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घ्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पाणीपुरवठा अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक या आठवड्यात होणार आहे. चर्चेनंतर पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एक वेळ पाणीपुरवठ्याचे धोरण जाहीर करतानाच बांधकामासाठी वापरणाऱ्यांवर कारवाई करू. बिले न भरणारांचे नळजोड तोडू, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, यापैकी कोणतीही कारवाई विभागाने केलेली नाही. २०१४-१५ या वर्षात पाणीपट्टी आणि इतर वसुलीतून ६० कोटींचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागासमोर होते. मात्र, त्यांपैकी केवळ ३२ कोटींची वसुली झाली होती. २०१५-१६ या वर्षांसाठी ६५ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यात कपात करून ५६ कोटी करण्यात आले. मात्र, आजपर्यंत २५ कोटींची वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)