शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 3, 2016 01:29 IST

चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत

पिंपरी : चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अगोदरच नियमितपणे पाणीपुरवठा होत नसताना बिलेही चुकीची येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. चुकीच्या बिलांमुळे फुगवटा वाढल्याने थकबाकी वसुलीत पाणीपुरवठा विभागास अपयश आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पाणीकपातीबाबत याच आठवड्यात बैठक होणार आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी पवना नदीद्वारे रावेत येथील बंधाऱ्यांवरून उचलून शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने दिवसातून एकवेळ पाणी पुरवठ्याचे नियोजन केले. त्यानुसार शहरात एकवेळ पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने पाटबंधारे विभागाने तातडीची बैठक घ्यावी, अशी सूचना पालिकेला केली आहे.पाणीपुरवठा नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घ्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पाणीपुरवठा अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक या आठवड्यात होणार आहे. चर्चेनंतर पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एक वेळ पाणीपुरवठ्याचे धोरण जाहीर करतानाच बांधकामासाठी वापरणाऱ्यांवर कारवाई करू. बिले न भरणारांचे नळजोड तोडू, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, यापैकी कोणतीही कारवाई विभागाने केलेली नाही. २०१४-१५ या वर्षात पाणीपट्टी आणि इतर वसुलीतून ६० कोटींचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागासमोर होते. मात्र, त्यांपैकी केवळ ३२ कोटींची वसुली झाली होती. २०१५-१६ या वर्षांसाठी ६५ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यात कपात करून ५६ कोटी करण्यात आले. मात्र, आजपर्यंत २५ कोटींची वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)