शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारांमुळे मेहनतीचे चीज, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुण्याची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:56 IST

पुरस्कारांच्यानिमित्ताने आजवर केलेल्या मेहनतीचे चीज झाले असून, पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे, अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या.

पुणे : पुरस्कारांच्यानिमित्ताने आजवर केलेल्या मेहनतीचे चीज झाले असून, पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे, अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या. पुण्याच्या कलाकारांनी ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची भूमिका असलेला ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे. पुरस्कारामुळे चांगल्या कामाला न्याय मिळाल्याची भावनाही कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अभिनेता प्रसाद ओकचे दिग्दर्शनातले पदार्पण असलेल्या ‘कच्चा लिंबू’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंदार देवस्थळीनिर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. जयवंत दळवी यांच्या ‘ॠणानुबंध’ या कादंबरीवर आधारित चित्रपटात गतिमंद मुलाच्या कुटुंबाचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. नागराज मंजुळेंना ‘पावसाचा निबंध’ या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. पावसाशी जुळलेली एका कुटुंबाची, एका गावाची कथा लघुपटातून रंजक पद्धतीने मांडण्याचा अनोखा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे. २५ मिनिटे कालावधीच्या या लघुपटाचे चित्रिकरण मुळशी परिसरात झाले आहे. ‘पिस्तुल्या’ लघुपटानंतर नऊ वर्षांनी नागराज मंजुळे यांनी हा दुसरा लघुपट दिग्दर्शित केला आहे.प्रसाद ओक म्हणाले, ‘चित्रपट दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्या जबाबदारीमध्ये खूप तफावत असते. त्यामुळे सुरुवातीला खूप दडपण आले होते. मात्र, संपूर्ण टीमच्या सहाय्याने हे शिवधनुष्य पेलता आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्व टीमचे एकत्रित यश आहे. पुरस्कारामुळे शाबासकीची थाप मिळाली असून, जबाबदारीही वाढली आहे.’>विशेष पुरस्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. चित्रपटनिर्मितीतील पहिल्याच प्रयत्नाला पुरस्काराच्या रुपाने मिळालेला राजाश्रय अत्यंत महत्त्वाचा आहे. विविध अडचणींवर मात करत चित्रपटाचा प्रवास झाला. पिफमध्येही चित्रपट गौरवला गेला. त्यामुळे कामाची उमेद वाढली आहे.- अमर देवकर, दिग्दर्शक आणि लेखक, म्होरक्या‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. प्रसाद ओकचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट माझ्या अत्यंत जवळचा आहे. चित्रपटासाठी केलेल्या कामाला चांगला न्याय मिळाल्याने खूप समाधान वाटत आहे.- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्रीचार-पाच वर्षांपासून लघुपटाची कल्पना सुचली होती. कामाच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नव्हता. मागील पावसाळ््यात आठ-नऊ दिवस मुळशी, पवना, तिकोना परिसरात चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाइतकेच लघुपट हेही सशक्त माध्यम आहे. भविष्यातही लघुपटाच्या माध्यमातून विविध विषय मांडायचा प्रयत्न करणार आहे.- नागराज मंजुळे, दिग्दर्शक