शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शांतता, पुणेकर वाचत आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 07:53 IST

महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासाला प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेचे धागे हजारो साहित्यिक, कलाकार आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने समृद्ध केले.

राजेश पांडे

संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासाला प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेचे धागे हजारो साहित्यिक, कलाकार आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने समृद्ध केले. या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचे माेठे कार्य १६ ते २४ डिसेंबर २०२३ या काळात पुण्यात होणार आहे. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरचा पुणे पुस्तक महोत्सव १६ डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. ‘एनबीटी’ची भारतीय भाषांमधील शेकडो पुस्तके प्रदर्शनात असतीलच; याशिवाय महाराष्ट्रातील पुस्तक प्रकाशक त्यांच्या पुस्तकांना घेऊन पुण्यात येत आहेत. केवळ प्रदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित नसून सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, सृजनशीलतेला चालना देणारे, वाचनसंस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम, प्रख्यात लेखकांच्या मुलाखती अशा अनेक अंगांनी हा महोत्सव साजरा होत आहे. लोकसहभाग हे या महोत्सवाचे अंगभूत वेगळेपण आहे. अनेक शिक्षण संस्था, नागरी संघटना, स्थानिक स्वराज संस्था यांच्यासह खासगी क्षेत्र आणि हजारो नागरिक महोत्सवात सहभागी होत आहेत. पुणे पुस्तक महोत्सव महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील लोकसहभागासाठी आखलेल्या उपक्रमांचे स्वरूप अभिनव आहे. पुण्यात होत असलेल्या अभिनव उपक्रमांमध्ये ‘शांतता, पुणेकर वाचत आहेत,’ हा ऐतिहासिक ठरेल. १४ डिसेंबरला दुपारी बारा ते एक या वेळेत हा उपक्रम आहे. या दिवशी, तासभर सारे पुणे वाचणार आहे. जिथे असाल तिथे एक तास तुमच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे, असे आवाहन पुणेकरांना केले आहे. ज्यांना अजून वाचता येत नाही अशा लहान मुलांना त्यांचे पालक त्याच दिवशी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयात गोष्ट सांगतील. एकाच वेळी पाच हजार पालकांचा सहभाग यात असणार आहे. दुपारी एका तासात एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये -चौकांपासून कॅफेपर्यंत आणि शाळा-महाविद्यालयांपासून कार्यालयांपर्यंत, रिक्षा थांब्यापासून ते मेट्रो स्थानकांमध्ये अशा हजारो ठिकाणी लाखो पुणेकर वाचन करतील. जवळपास पाच हजार संस्था, संघटना आणि प्रभावशाली व्यक्ती या उपक्रमाच्या रूपाने एक विश्वविक्रम घडवतील.

पुण्यातील ऐतिहासिक, वारसा असलेल्या अशा तीस ठिकाणांहून १५ डिसेंबरला ज्ञानसरिता दिंड्या निघतील. महापुरुषांच्या आणि साहित्यिकांच्या विचारांची प्रेरणा या दिंड्या देतील. महाराष्ट्र, देश घडविणारी महान व्यक्तिमत्त्वे पुण्याने दिली. या व्यक्तिमत्त्वांची निवासस्थाने, कर्तृत्वाची ठिकाणे पुण्यात आहेत. दिंड्या या स्थानापासून सुरू होत, फर्ग्युसन कॉलेज येथे पोहोचतील.

हजारो पुस्तकांच्या साह्याने एक शब्द आणि जयतु भारत हे वाक्य ‘लिहिण्याचा’ उपक्रमही आयोजित केला आहे. पुणे पुस्तक महोत्सवात अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा आणि त्यातून वाचनसंस्कृती वाढीस लागावी, हा एकमेव हेतू या साऱ्या उपक्रमांमागे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेने पुणे पुस्तक महोत्सवात नॅशनल बुक ट्रस्टच्या बरोबरीने भाग घेतला आहे. त्यामुळेच, हा महोत्सव एरव्हीच्या पुस्तक प्रदर्शनांपेक्षा वेगळा ठरतो आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील अनेक दिग्गज लेखकांना ऐकण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाच्या बरोबरीनेच महाराष्ट्राला पहिली ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ मिळण्याची शक्यता खूप आहे. या शक्यतेला वास्तवाची जाणीव करून देण्याचे काम महोत्सवातील लोकसहभागातून होईल, अशी अपेक्षा आहे. ‘युनेस्को’ दरवर्षी जगातील एका शहराची निवड ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ म्हणून करते. पुणे पुस्तक महोत्सव जागतिक राजधानीच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरणार आहे.