शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

पवार म्हणाले ‘त्यांच्या पोटात नक्की दुखले असेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST

पुणे : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुण्याच्या १४ लाख लोकांना पाणी मिळणार आहे. पण यामुळे काही लोकांच्या पोटात नक्की ...

पुणे : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुण्याच्या १४ लाख लोकांना पाणी मिळणार आहे. पण यामुळे काही लोकांच्या पोटात नक्की दुखले असेल, असा चिमटा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढला.

भामा आसखेड प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर ते शुक्रवारी (दि. १) बोलत होते. पवार म्हणाले, की हा प्रकल्प पूर्ण करण्याची अवदसा कुठून आठवली आणि निघाले हे पाणी द्यायला यांना असेच टँकरमाफियांना वाटत असेल.

पूर्व पुण्यातल्या वडगाव शेरी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस आदी भागातल्या सततच्या पाणी टंचाईमुळे येथील लोक त्रस्त होते. जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याचा हा काही भाग येत असे. त्यावेळी मत मागायला गेल्यानंतर लोक म्हणत, ‘मत देतो पण पाणी द्या.’ या भागात टँकर माफियांचे राज्य चालायचे, ते कशारितीने पाणी द्यायचे हे मला माहिती आहे. या योजनेमुळे येथील नागरिकांची स्वप्नपुर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.

चौकट

चंद्रकांतदादांची सूचना मान्य

“भामा आसखेडचे पाणी पुण्यात आल्याने खडकवासला धरण साखळीतून होणारा पाणीपुर‌वठा कमी होण्याची भीती पुणेकरांना वाटते. हा पुरवठा कमी करु नये अशी विनंती मी अजित पवार यांना करतो,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुण्याचे पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी याचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घ्यावी, असेही पाटील यांनी सुचवले. अजित पवार यांनी ही सूचना मान्य केली. ग्राम पंचायत निवडणुकीनंतर सर्व संबंधितांची बैठक घेऊन पुण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

चौकट

पुण्याचा वाढता पाणीवापर

अजित पवार म्हणाले की १९९१ मध्ये पुण्याला पाच टीएमसी पाणी लागत असे. आता ही गरज साडे सतरा-अठरा टीएमसीवर गेली आहे. पुण्यात दरडोई दैनंदिन पाणीपुरवठा सव्वातीनशे लिटर होतो. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया योग्य झाल्यास या पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करता येईल. पाण्याची उपलब्धता नसलेल्या शहरांचा विकास खुंटतो. या पार्श्वभूमीवर “पुण्याच्या पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी नियोजन केले जाईल पण पुण्याला पाणी कमी पडू दिले जाणार नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले.