शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन टीएमसी पाणी बचत

By admin | Updated: April 6, 2016 01:32 IST

शहरामध्ये सप्टेंबर २०१५ पासून लागू केलेल्या ३० टक्के पाणीकपातीला ७ महिने पूर्ण झाले असून, या ७ महिन्यांमध्ये तब्बल पावणेदोन टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिका प्रशासनास यश आले

पुणे : शहरामध्ये सप्टेंबर २०१५ पासून लागू केलेल्या ३० टक्के पाणीकपातीला ७ महिने पूर्ण झाले असून, या ७ महिन्यांमध्ये तब्बल पावणेदोन टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. धरणातील उपलब्ध पाणी जून अखेरपर्यंत वापरण्याचे नियोजन असून, त्याकरिता आणखी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्के कपात करून ६ सप्टेंबर २०१५ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये असलेला उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याचे वितरण करण्यातील अडचणी, या सर्वांवर चर्चा करण्यात आली. एकंदरीत परिस्थिती पाहता शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय स्पष्ट झाल्याने एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने मान्यता दिली होती.एकदिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यापूर्वी शहराला एका महिन्याला सव्वा टीएमसी पाणी लागत होते. एकदिवसाआड पाणीपुरवठ्यानंतर सध्या एक टीएमसी पाणी खडकवासला धरणातून उचलले जात आहे. पाणीकपात लागू होऊन ७ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानुसार या ७ महिन्यांमध्ये पावणे दोन टीएमसी पाण्याची बचत झाली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. भरारी पथकांकडून मात्र ठोस कारवाई नाहीपाणीकपात लागू करताना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी पाण्याचा गैरवापर रोखणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याकरिता भरारी पथकांची स्थापना केली होती. मात्र, या भरारी पथकांकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. बांधकामासाठी, वॉशिंग सेंटर, जलतरण तलावासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, जलतरण तलावाचा निर्णय नंतर फिरविण्यात आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात सिमेंटच्या रस्त्यांची मोठी कामे काढून, त्यावर पाण्याची मोठी नासाडी झाली आहे.