शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पावणेदोन टीएमसी पाणी बचत

By admin | Updated: April 6, 2016 01:32 IST

शहरामध्ये सप्टेंबर २०१५ पासून लागू केलेल्या ३० टक्के पाणीकपातीला ७ महिने पूर्ण झाले असून, या ७ महिन्यांमध्ये तब्बल पावणेदोन टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिका प्रशासनास यश आले

पुणे : शहरामध्ये सप्टेंबर २०१५ पासून लागू केलेल्या ३० टक्के पाणीकपातीला ७ महिने पूर्ण झाले असून, या ७ महिन्यांमध्ये तब्बल पावणेदोन टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. धरणातील उपलब्ध पाणी जून अखेरपर्यंत वापरण्याचे नियोजन असून, त्याकरिता आणखी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्के कपात करून ६ सप्टेंबर २०१५ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये असलेला उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याचे वितरण करण्यातील अडचणी, या सर्वांवर चर्चा करण्यात आली. एकंदरीत परिस्थिती पाहता शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय स्पष्ट झाल्याने एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने मान्यता दिली होती.एकदिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यापूर्वी शहराला एका महिन्याला सव्वा टीएमसी पाणी लागत होते. एकदिवसाआड पाणीपुरवठ्यानंतर सध्या एक टीएमसी पाणी खडकवासला धरणातून उचलले जात आहे. पाणीकपात लागू होऊन ७ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानुसार या ७ महिन्यांमध्ये पावणे दोन टीएमसी पाण्याची बचत झाली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. भरारी पथकांकडून मात्र ठोस कारवाई नाहीपाणीकपात लागू करताना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी पाण्याचा गैरवापर रोखणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याकरिता भरारी पथकांची स्थापना केली होती. मात्र, या भरारी पथकांकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. बांधकामासाठी, वॉशिंग सेंटर, जलतरण तलावासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, जलतरण तलावाचा निर्णय नंतर फिरविण्यात आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात सिमेंटच्या रस्त्यांची मोठी कामे काढून, त्यावर पाण्याची मोठी नासाडी झाली आहे.