शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

खड्ड्यांपासून होणार सुटका

By admin | Updated: August 9, 2016 01:58 IST

शहरात मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महावितरण यांच्याकडून वारंवार होत असलेल्या खोदाईपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करून सेवावाहिनी टाकण्याची यशस्वी

पुणे : शहरात मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महावितरण यांच्याकडून वारंवार होत असलेल्या खोदाईपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करून सेवावाहिनी टाकण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा मार्ग मोकळा झाला असून याकामी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. आॅक्टोबर महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.महापालिकेच्या वतीने खोदाई मुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या सहा कंपन्यांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खोदाई न करता सेवा वाहिन्या टाकण्याची चाचणी करून दाखविली. या वेळी मोबाईल कंपन्या, महावितरण, गॅस कंपन्या यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले, ‘‘खोदाईमुक्त तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांनी जमिनीमध्ये छेद घेऊन मशिनीच्या साह्याने सेवा वाहिनी टाकण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महावितरण, गॅस कंपन्यांना सेवा वाहिनी टाकण्यास अवघड जाणाऱ्या ठिकाणीही याची चाचणी घेतली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.’’ मोबाईल कंपन्यांकडून इंटरनेटची ४ जी सेवा कार्यान्वित केली जात असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील वर्षभरात आणखी खोदाई करण्याचे नियोजन आहे. रस्ता खोदाई करताना रहदारीस अडथळा, राडारोडा, वाहने घसरणे, धुळीचा नागरिकांना होणारा त्रास यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे खोदाईचे निश्चित धोरण ठरविण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने करण्यात येत होती. (प्रतिनिधी)