शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST

पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे ...

पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे राजकारण आणि सत्याचे समाजकारण केले. तसेच ज्ञान, विज्ञान आणि समाज परिवर्तनाचे प्रयोग शिक्षण विश्वात रुजवले, शिक्षणाचा ध्येयवाद भारताचा नकाशा ओलांडून परदेशात पोचवला,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात सबनिस बोलत होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी कुलगुरु एस.एफ. पाटील, विचारभारतीचे संपादक प्रा. मिलिदं जोशी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए.बी. जाधव, उपस्थित होते. याप्रसंगी विचारभारतीच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मिलिंद जोशी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते. हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वत: अनुभवले होते. पुढच्या पिढीच्या वाटयाला हे जीवन येऊ नये म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. महानगराबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात शिक्षण केंद्रे उभे करुन तेथील घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम भारती विद्यापीठाने केले.डॉ. कदम यांची ध्येयनिष्ठा, गुणवत्तेचा ध्यास आणि दूरदृष्टी यामुळे भारती विद्यापीठाचा यशाचा आलेख सतत उंचावत राहिला.

ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले डॉ एम एस सगरे यांनी आभार मानले