शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST

पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे ...

पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे राजकारण आणि सत्याचे समाजकारण केले. तसेच ज्ञान, विज्ञान आणि समाज परिवर्तनाचे प्रयोग शिक्षण विश्वात रुजवले, शिक्षणाचा ध्येयवाद भारताचा नकाशा ओलांडून परदेशात पोचवला,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात सबनिस बोलत होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी कुलगुरु एस.एफ. पाटील, विचारभारतीचे संपादक प्रा. मिलिदं जोशी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए.बी. जाधव, उपस्थित होते. याप्रसंगी विचारभारतीच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मिलिंद जोशी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते. हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वत: अनुभवले होते. पुढच्या पिढीच्या वाटयाला हे जीवन येऊ नये म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. महानगराबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात शिक्षण केंद्रे उभे करुन तेथील घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम भारती विद्यापीठाने केले.डॉ. कदम यांची ध्येयनिष्ठा, गुणवत्तेचा ध्यास आणि दूरदृष्टी यामुळे भारती विद्यापीठाचा यशाचा आलेख सतत उंचावत राहिला.

ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले डॉ एम एस सगरे यांनी आभार मानले