शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST

पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे ...

पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे राजकारण आणि सत्याचे समाजकारण केले. तसेच ज्ञान, विज्ञान आणि समाज परिवर्तनाचे प्रयोग शिक्षण विश्वात रुजवले, शिक्षणाचा ध्येयवाद भारताचा नकाशा ओलांडून परदेशात पोचवला,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात सबनिस बोलत होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी कुलगुरु एस.एफ. पाटील, विचारभारतीचे संपादक प्रा. मिलिदं जोशी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए.बी. जाधव, उपस्थित होते. याप्रसंगी विचारभारतीच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मिलिंद जोशी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते. हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वत: अनुभवले होते. पुढच्या पिढीच्या वाटयाला हे जीवन येऊ नये म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. महानगराबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात शिक्षण केंद्रे उभे करुन तेथील घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम भारती विद्यापीठाने केले.डॉ. कदम यांची ध्येयनिष्ठा, गुणवत्तेचा ध्यास आणि दूरदृष्टी यामुळे भारती विद्यापीठाचा यशाचा आलेख सतत उंचावत राहिला.

ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले डॉ एम एस सगरे यांनी आभार मानले