शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

प्रवाशांना टुरच्या पैशांसह १२ लाख ४१ हजार रुपये परत करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केरळ आणि कन्याकुमारी टुरचे संपूर्ण पैसे भरूनही कंपनीकडून प्रवाशांना योग्य सेवा देण्यात आली नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केरळ आणि कन्याकुमारी टुरचे संपूर्ण पैसे भरूनही कंपनीकडून प्रवाशांना योग्य सेवा देण्यात आली नाही. याप्रकरणी कंपनीने कसूर केल्याबददल प्रवाशांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपाईपोटी एका हॉलिडेज कंपनीला पाच लाख मोजावे लागणार लागणार आहे. कंपनीला एकूण १२ लाख ४१ हजार रुपये तक्रारदारांना परत करावे लागणार आहेत.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्वागत हॉलिडेज विरोधात हा निकाल दिला आहे. तक्रारदारांनी कंपनीकडून केरळ आणि कन्याकुमारी टुरसाठी कंपनीचे पॅकेज घेतले होते. ही टूर कंपनीने एक दिवस उशिराने सुरू केली. विमानाने पुण्याहून कोयंबटूर एवजी बंगरुळला नेले. ट्रीप मॅनेजर बरोबर पाठवला नाही. साध्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. हॉटेलमध्ये पाणी, जेवण आणि इतर अनेक बाबींकरता आम्हाला खर्च करावा लागला. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना अतिरिक्त १ लाख ५३ हजार रुपये खर्च करावा लागला, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदारांना टूरसाठी भरलेले ५ लाख १६ हजार ५०० रुपये टूर कंपनीने १० टक्के व्याजाने परत करावे. दंडात्मक खर्च म्हणून दोन लाख रुपये द्यावेत. तसेच प्रवाशांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी पाच लाख रुपये आणि तक्रारखर्च म्हणून २५ हजार रुपये तक्रारदारांना द्यावेत, असा निकाल आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी दिला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर ४५ दिवसांत पैसे परत न केल्यास १५ टक्के व्याज आकारले जाईल, असे आदेशात नमूद आहे. प्रवाशांच्या वतीने अँड. ज्ञानराज संत यांनी या तक्रारीचे कामकाज पाहिले. टुरच्या पुढील खर्चासाठी कंपनीने ४० हजार रुपये तक्रारदारांकडून घेतले. हे पैसे परत करण्यासाठी दिलेला दोन लाख रुपयांचा चेक कंपनीने दिला होता. मात्र तो वटलाच नाही.

----------------------------