शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील रोजंदारीवर, मुलगा ‘एमपीएससी’चा वारकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : येत्या १४ मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : येत्या १४ मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून कष्ट घेत आहेत. मात्र ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची बातमी गुरुवारी (दि.११) पुढे आली आणि यातल्या अनेकांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. कारण पुण्यासारख्या शहरात राहून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचे पालक गावाकडे रोजंदारी करून, मोलमजूरी करून त्यांना शिकवत आहेत.

परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले त्यामागे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची वेदना मोठ्या प्रमाणात आहे. काय आहेत या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

पुण्यात गेल्या काही वर्षांत शेकडो अभ्यासिका उभ्या राहिल्या. प्रामुख्याने मध्यवस्तीतल्या, पेठांमधल्या या अभ्यासिका म्हणजे एक खोली आणि त्यात ओळीने मांडलेल्या टेबल-खुर्च्या. काही अभ्यासिकांमध्ये वायफाय ते लायब्ररीपर्यंतची सोय. पण प्रत्येक विद्यार्थ्याचे विश्व असते त्याची टेबल, खुर्चीच. दिवसातले जवळपास १० ते ११ तास विद्यार्थी या खुर्चीवर बसून असतात. कोणी पुस्तके वाचतो, कोणी कानाला हेडफोन लावून व्याख्याने ऐकतो... आणि यासाठी हे विद्यार्थी मोजतात महिन्याकाठी किमान आठशे ते दोन हजार रुपये. हा खर्च अनेक मुलांना परवडतही नाही.

दिवसभर याच अभ्यासिकेतला अभ्यास आणि रात्री नोकरी हे गेल्या २ वर्षांचे आशिष पवारचे ‘रूटिन’ आहे. २३ वर्षांचा आशिष पवार यवतमाळचा. त्याचे पालक मोलमजुरी करतात. त्यातून त्यांचा स्वत:चाच खर्च भागवताना त्यांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे पुण्यात राहायला आलेल्या आशिषला स्वत:चा खर्च स्वत: भागवावा लागतो. त्यासाठी दिवसभर अभ्यास आणि रात्री वाॅचमनची नोकरी करत तो महिन्याकाठी येणारा ८ ते १० हजारांची जुळणी कशीतरी करतो. पुस्तक खरेदी किंवा इतर काही खर्च आला की हे गणित कोलमडते.

आशिषने ‘लोकमत’ला सांगितले की, “एका खोलीत दहा-बारा जण राहतो. कष्टाने परीक्षेची तयारी करतो. पण दोन वर्षे परीक्षाच झाली नाही. काय करावे ते कळत नाही. घरच्यांना माहितीये की मुलगा परीक्षा द्यायला पुण्याला गेलाय. पण पुण्यात राहूनही मुलाला परीक्षा का देता आली नाही हे त्यांना कुठे माहीत आहे?”

आशिषसारखीच अवस्था नांदेडच्या २३ वर्षांच्या सम्यक कोकरेची. त्याच्या घरचेही मोलमजुरी करतात. सम्यक सांगतो, “मुलगा पुण्यात गेला म्हणजे त्याचे आयुष्य सुधारेल, परीक्षा झाली की त्याला सरकारी नोकरी लागेल, असे पालकांना वाटते. आई-वडील रोजंदारीवर जातात. त्या कमाईतून त्यांच्या पोटाची सोय होते. पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी पैसे पाठवतात. एक वर्ष त्यांनी मदत केली. मग कोरोना आला. आता परीक्षाच नाही.” आता काय करावे, हे कोडे सम्यकला उलगडत नाही.

अशीच अवस्था कमी-अधिक फरकाने सगळ्याच विद्याथर्यांची. मग एवढे असून ‘एमपीएससी’चे आकर्षण का, असे विचारल्यावर कोल्हापूरचा एक विद्यार्थी म्हणाला, “घरची शेती आहे. शेतीमधली दुरवस्था बघितल्यानंतर शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. शिक्षण संपल्यावर नोकरी मिळेना म्हणून एमपीएससीकडे वळलो.” हजारो विद्यार्थ्यांची हीच कहाणी. कोणी २१ व्या वर्षी तयारी सुरू केली, कोणी २३ व्या. पण दोन-चार वर्षे अभ्यास करून परीक्षाच होईना. त्यामुळे हा सगळा वेळ, आई-वडलांचे कष्ट, वय, पैसा वाया जाणार का, ही चिंता हजारो विद्यार्थ्यांना सतावते आहे. या चिंतेचा उद्रेक झाला आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले.