शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

आई-वडील रोजंदारीवर, मुलगा ‘एमपीएससी’चा वारकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : येत्या १४ मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : येत्या १४ मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून कष्ट घेत आहेत. मात्र ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची बातमी गुरुवारी (दि.११) पुढे आली आणि यातल्या अनेकांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. कारण पुण्यासारख्या शहरात राहून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचे पालक गावाकडे रोजंदारी करून, मोलमजूरी करून त्यांना शिकवत आहेत.

परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले त्यामागे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची वेदना मोठ्या प्रमाणात आहे. काय आहेत या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

पुण्यात गेल्या काही वर्षांत शेकडो अभ्यासिका उभ्या राहिल्या. प्रामुख्याने मध्यवस्तीतल्या, पेठांमधल्या या अभ्यासिका म्हणजे एक खोली आणि त्यात ओळीने मांडलेल्या टेबल-खुर्च्या. काही अभ्यासिकांमध्ये वायफाय ते लायब्ररीपर्यंतची सोय. पण प्रत्येक विद्यार्थ्याचे विश्व असते त्याची टेबल, खुर्चीच. दिवसातले जवळपास १० ते ११ तास विद्यार्थी या खुर्चीवर बसून असतात. कोणी पुस्तके वाचतो, कोणी कानाला हेडफोन लावून व्याख्याने ऐकतो... आणि यासाठी हे विद्यार्थी मोजतात महिन्याकाठी किमान आठशे ते दोन हजार रुपये. हा खर्च अनेक मुलांना परवडतही नाही.

दिवसभर याच अभ्यासिकेतला अभ्यास आणि रात्री नोकरी हे गेल्या २ वर्षांचे आशिष पवारचे ‘रूटिन’ आहे. २३ वर्षांचा आशिष पवार यवतमाळचा. त्याचे पालक मोलमजुरी करतात. त्यातून त्यांचा स्वत:चाच खर्च भागवताना त्यांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे पुण्यात राहायला आलेल्या आशिषला स्वत:चा खर्च स्वत: भागवावा लागतो. त्यासाठी दिवसभर अभ्यास आणि रात्री वाॅचमनची नोकरी करत तो महिन्याकाठी येणारा ८ ते १० हजारांची जुळणी कशीतरी करतो. पुस्तक खरेदी किंवा इतर काही खर्च आला की हे गणित कोलमडते.

आशिषने ‘लोकमत’ला सांगितले की, “एका खोलीत दहा-बारा जण राहतो. कष्टाने परीक्षेची तयारी करतो. पण दोन वर्षे परीक्षाच झाली नाही. काय करावे ते कळत नाही. घरच्यांना माहितीये की मुलगा परीक्षा द्यायला पुण्याला गेलाय. पण पुण्यात राहूनही मुलाला परीक्षा का देता आली नाही हे त्यांना कुठे माहीत आहे?”

आशिषसारखीच अवस्था नांदेडच्या २३ वर्षांच्या सम्यक कोकरेची. त्याच्या घरचेही मोलमजुरी करतात. सम्यक सांगतो, “मुलगा पुण्यात गेला म्हणजे त्याचे आयुष्य सुधारेल, परीक्षा झाली की त्याला सरकारी नोकरी लागेल, असे पालकांना वाटते. आई-वडील रोजंदारीवर जातात. त्या कमाईतून त्यांच्या पोटाची सोय होते. पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी पैसे पाठवतात. एक वर्ष त्यांनी मदत केली. मग कोरोना आला. आता परीक्षाच नाही.” आता काय करावे, हे कोडे सम्यकला उलगडत नाही.

अशीच अवस्था कमी-अधिक फरकाने सगळ्याच विद्याथर्यांची. मग एवढे असून ‘एमपीएससी’चे आकर्षण का, असे विचारल्यावर कोल्हापूरचा एक विद्यार्थी म्हणाला, “घरची शेती आहे. शेतीमधली दुरवस्था बघितल्यानंतर शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. शिक्षण संपल्यावर नोकरी मिळेना म्हणून एमपीएससीकडे वळलो.” हजारो विद्यार्थ्यांची हीच कहाणी. कोणी २१ व्या वर्षी तयारी सुरू केली, कोणी २३ व्या. पण दोन-चार वर्षे अभ्यास करून परीक्षाच होईना. त्यामुळे हा सगळा वेळ, आई-वडलांचे कष्ट, वय, पैसा वाया जाणार का, ही चिंता हजारो विद्यार्थ्यांना सतावते आहे. या चिंतेचा उद्रेक झाला आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले.