शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

शिष्यवृत्तीच्या बदलांबाबत पालक उदासीन

By admin | Updated: October 2, 2015 00:47 IST

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते.

पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला तीन आठवड्यानंतरही पालकांचा अत्यंत नगण्य प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत परीक्षा परिषदेकडे आलेल्या सूचनांमध्ये शिक्षकांचाच सहभाग दिसत असून, बोटावर मोजण्या इतक्याच पालकांनी सूचना, मत व्यक्त केले आहे. यावरून या प्रक्रियेबाबत पालक उदासीन असल्याने दिसत आहे.यामुळे यंदा चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन होणार नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च २०१७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. उपलब्ध कालावधीचा वापर करून या परीक्षेत बदल करून सुधारणा करण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविले आहे. त्यानुसार यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील शिक्षक-पालकांकडून अभिप्राय, सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र, या आवाहनाला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच पालकांनी आपल्या सूचना परीक्षा परिषदेकडे पाठविल्या आहेत. शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम व परीक्षेबाबत पालकांच्याही सक्रिय सहभागाची परीक्षा परिषदेला अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षेत कोणत्या विषयांचा समावेश करणे अपेक्षित आहे, विषयांची संख्या, प्रश्नपत्रिकांसाठी लागणारा वेळ, विद्यार्थ्यांचा स्तर, इतर कोणते बदल करावेत यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचे मतही जाणून घेण्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर एक प्रश्नावली ठेवण्यात आली आहे. मात्र त्याला अल्पप्रतिसाद लाभला आहे. पालकांनी उदासीनता सोडून सक्रिय सहभाग करावा, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. (प्रतिनिधी)