शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीसाठी १०८ सेवा ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 06:17 IST

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची डायल १०८ सेवा गर्भवती महिला आणि अर्भकांसाठी वरदान ठरत आहे.

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची डायल १०८ सेवा गर्भवती महिला आणि अर्भकांसाठी वरदान ठरत आहे. १०८ सेवेच्या रुग्णवाहिकांमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल १५,५३६ बालकांनी जम घेतला आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून तातडीची वैद्यकीय सेवा मिळाल्याने महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. यामध्ये आतापर्यंत पुण्यातील १,००२ बालकांचा समावेश आहे.नाशिकमध्ये या सेवेचा सर्वाधिक लाभ झाला असून तेथील १,०८५ बालकांनी रुग्णवाहिकेमध्ये जन्म घेतला आहे. राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ही सेवा असून रुग्णवाहिकेत प्रसूती झालेली आकडेवारी मोठी असल्याचे यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ही तातडीची सेवा सुरू केली होती. तेव्हापासून ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांत राज्यभरातून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांनी या सेवेला सुरुवातीपासून उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत १०८ हा क्रमांक डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह हजर होते. यामध्ये अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीने भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन घटनांचा समावेश होतो.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड या सेवाक्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) सेवेच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका या सेवेसाठी राज्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये २३३ अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका असून, ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका समाविष्ट आहेत.याबाबत महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामध्ये काही वेळा दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने आजही बाळंतपणात होणाºया अपघातांची संख्या जास्त आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार, असे वाटल्यानंतर गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी १०८ सेवेशी संपर्क साधल्यास पुढील त्रास वाचू शकतो. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यास उशीर न केल्यास गरजू महिलेला वेळेत मदत मिळून मातामृत्यू व अर्भकमृत्यू टाळता येणे शक्य आहे.’’