शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

पिरंगुट रासायनिक दुर्घटना; कंपनी मालकाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने ...

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश एस. बी. गणपा यांनी हा आदेश दिला आहे.

निकुंज शहा (वय ३९, रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याच्यासह बिपिन शहा (वय ६८ रा. सहकारनगर), केयूर बिपिन शहा (वय ४१, मूळ रा. सहकारनगर, रा. दुबई) यांच्यावरदेखील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. दि. ७ जून रोजी एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला आग लागून त्यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यास तसेच अनधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. दि. ८ जूनला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कंपनीच्या मालकाला बुधवारी (दि. ९) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील नीलेश लडकत यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यामध्ये १७ लोकांची जीवितहानी झाली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना अटक करायचे असून, पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, आरोपीच्या बाजूने ॲड. हर्षद निंबाळकर यांनी असा युक्तिवाद केला की, आम्हाला या गुन्ह्याचे गांभीर्य असून मृत कामगारांबाबत सहानुभूती देखील आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली आहे. तरीही पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंडविधान कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मात्र, या प्रकरणात ३०४ कलम लावणे योग्य नाही. कारण आरोपींना त्यांच्या कृतीमुळे कुणाचा मृत्यू ओढावेल याचे ज्ञान नव्हते. भोपाळ गॅस दुर्घटना आणि २०१२ मध्येही घडलेल्या घटनेचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने ३०४ अ हेच कलम लावले असल्याचा उल्लेख ॲड. निंबाळकर यांनी केला. याशिवाय त्यांच्याकडे उत्पादन निर्मितीचा परवाना आहे, चौकशी समितीलादेखील आरोपीने सहकार्य केले आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही, असे निंबाळकर यांचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

-----------