शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

पिरंगुट रासायनिक दुर्घटना; कंपनी मालकाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने ...

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश एस. बी. गणपा यांनी हा आदेश दिला आहे.

निकुंज शहा (वय ३९, रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याच्यासह बिपिन शहा (वय ६८ रा. सहकारनगर), केयूर बिपिन शहा (वय ४१, मूळ रा. सहकारनगर, रा. दुबई) यांच्यावरदेखील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. दि. ७ जून रोजी एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला आग लागून त्यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यास तसेच अनधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. दि. ८ जूनला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कंपनीच्या मालकाला बुधवारी (दि. ९) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील नीलेश लडकत यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यामध्ये १७ लोकांची जीवितहानी झाली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना अटक करायचे असून, पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, आरोपीच्या बाजूने ॲड. हर्षद निंबाळकर यांनी असा युक्तिवाद केला की, आम्हाला या गुन्ह्याचे गांभीर्य असून मृत कामगारांबाबत सहानुभूती देखील आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली आहे. तरीही पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंडविधान कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मात्र, या प्रकरणात ३०४ कलम लावणे योग्य नाही. कारण आरोपींना त्यांच्या कृतीमुळे कुणाचा मृत्यू ओढावेल याचे ज्ञान नव्हते. भोपाळ गॅस दुर्घटना आणि २०१२ मध्येही घडलेल्या घटनेचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने ३०४ अ हेच कलम लावले असल्याचा उल्लेख ॲड. निंबाळकर यांनी केला. याशिवाय त्यांच्याकडे उत्पादन निर्मितीचा परवाना आहे, चौकशी समितीलादेखील आरोपीने सहकार्य केले आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही, असे निंबाळकर यांचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

-----------