शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पिरंगुट रासायनिक दुर्घटना; कंपनी मालकाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने ...

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश एस. बी. गणपा यांनी हा आदेश दिला आहे.

निकुंज शहा (वय ३९, रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याच्यासह बिपिन शहा (वय ६८ रा. सहकारनगर), केयूर बिपिन शहा (वय ४१, मूळ रा. सहकारनगर, रा. दुबई) यांच्यावरदेखील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. दि. ७ जून रोजी एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला आग लागून त्यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यास तसेच अनधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. दि. ८ जूनला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कंपनीच्या मालकाला बुधवारी (दि. ९) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील नीलेश लडकत यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यामध्ये १७ लोकांची जीवितहानी झाली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना अटक करायचे असून, पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, आरोपीच्या बाजूने ॲड. हर्षद निंबाळकर यांनी असा युक्तिवाद केला की, आम्हाला या गुन्ह्याचे गांभीर्य असून मृत कामगारांबाबत सहानुभूती देखील आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली आहे. तरीही पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंडविधान कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. मात्र, या प्रकरणात ३०४ कलम लावणे योग्य नाही. कारण आरोपींना त्यांच्या कृतीमुळे कुणाचा मृत्यू ओढावेल याचे ज्ञान नव्हते. भोपाळ गॅस दुर्घटना आणि २०१२ मध्येही घडलेल्या घटनेचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने ३०४ अ हेच कलम लावले असल्याचा उल्लेख ॲड. निंबाळकर यांनी केला. याशिवाय त्यांच्याकडे उत्पादन निर्मितीचा परवाना आहे, चौकशी समितीलादेखील आरोपीने सहकार्य केले आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही, असे निंबाळकर यांचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

-----------