शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

पाकिस्तानच्या डीएनएतच भारतद्वेष

By admin | Updated: April 25, 2017 04:07 IST

पाकिस्तानी नागरिकांच्या डीएनएमध्येच भारतद्वेष असून, तेथील राजकारणी आणि लष्कर देखील द्वेष वाढविण्यावच भर देत आहेत.

पुणे : पाकिस्तानी नागरिकांच्या डीएनएमध्येच भारतद्वेष असून, तेथील राजकारणी आणि लष्कर देखील द्वेष वाढविण्यावच भर देत आहेत. भारतद्वेषावर राजकारण टिकून असल्याची त्यांची भावना आहे. तेथील सत्ताधाऱ्यांची अशी मानसिकता बदलल्याशिवाय भारत-पाकिस्तान चांगल्या संबंधाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानातील घडामोडींचे अभ्यासक माजी सनदी अधिकारी तिलक देवाशर यांनी सोमवारी येथे केले. अराईज अ‍ॅण्ड अवेक आणि महावीर जैन हॉस्टेलच्या वतीने बीएमसीसी महाविद्यालया जवळील जैन हॉस्टेलच्या प्रांगणात देवाशर यांचे ‘भारत-पाक संबंध’ या विषयावर व्याख्यान झाले. महावीर जैन हॉस्टेलचे सचिव युवराज शहा, डॉ. अशोक विखे-पाटील, अराईज अ‍ॅण्ड अवेकचे संस्थापक सचिन इटकर उपस्थित होते. देवाशर म्हणाले, ‘‘गेल्या सत्तर वर्षांपासून भारत पाकिस्तानशी एका चांगल्या शेजाऱ्याप्रमाणे राहायचा प्रयत्न करीत आहे. या दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी शंभरावर बैठका झाल्या असतील. मात्र, दोन देशांमधील संबंध सुधारण्या ऐवजी आणखी बिघडत आहेत. याला कारण म्हणजे तेथील लष्कर आणि राजकारणी देखील भारतविरोधी प्रतिमाच जनमाणसात तयार करीत आहेत. ही वृत्ती त्यांनी सोडून दिली पाहिजे. कधी काश्मीर प्रश्नावरुन, तर कधी सिंधु खोऱ्यातील पाणी वाटपावरुन भारताला लक्ष्य केले जाते. काहीवेळा लष्कराच्या तर कधी दहशतवाद्यांच्या माध्यमातून कुरापती केल्या जातात.’’ (प्रतिनिधी)