शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वानराचे जोडपे पुण्यात आले अन‌् जीव गमावून बसले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST

पुणे : शहरात आल्यानंतर कधी कोणाचा जीव जाईल, हे सांगता येत नाही. वन्यजीवांची तर कोणी कदरच करत नाही. काही ...

पुणे : शहरात आल्यानंतर कधी कोणाचा जीव जाईल, हे सांगता येत नाही. वन्यजीवांची तर कोणी कदरच करत नाही. काही दिवसांपुर्वी गव्याला आपला जीव गमवावा लागला, तर शनिवारी दोन वानराच्या जोडप्याला देखील आपले प्राण रस्त्यावर सोडावे लागले. कारण दोन वाहनांनी दोघांना धडक दिली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खराडी बायपास रस्त्यावरील माजी महापौर चंचला कोद्रे पुलावर घडली.

शनिवारी (दि. २६) दुपारी ३ वाजता वानर नर मादी पुलावर जात असल्याचे दिसले. मादी अचानक रस्ता ओलांडत असताना एका चार चाकी वाहनाने तिला जोरदार धकड दिली. रस्त्यावर पडलेल्या मादीला पाहण्यासाठी नर वानर जात असतानाच त्यालाही एका वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या दोघांचा त्या रस्त्यावर जीव गेला.

याची माहिती मिळताच खराडी स्मशानभूमीतील सेवक कैलास भगत आणि वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन चे सदस्य साईदास कुसळ, नीता गजरे, ऋषी ढावरे, सतीश भवाळ, अशोक जाधव आदींनी एकत्र येऊन या दोन्ही वानरांना रस्त्याच्या बाजूला घेतले. त्यानंतर वन विभागाला त्याची माहिती देण्यात आली. वन विभागाच्या परवानगीनेच खराडीत भगत यांनी स्वखर्चाने खराडी -शिवणे रस्त्याच्या बाजूला खड्डा खोदून विधिवत अंत्यसंस्कार केले.

----------------------------

एक वानर बचावले...

पुलावर एकूण तीन वानर फिरत होते. त्यापैकी एक वानर घाबरून पळून गेले, तर दोघांचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे मुंढवा-खराडी परिसरात ही माहिती समजताच अनेकजण अंत्यसंस्कारासाठी जमा झाले होते. हे तीन वानर कुठून आले, याची माहिती मात्र कोणालाही नाही.

--------------------

समाधीवर रोप लावून श्रध्दांजली

दोन्ही वानरांना खड्डा करून अत्यंसंस्कार केले. त्यानंतर तिथेच एक रोप लावून ते वाढविण्याचा प्रण कैलास भगत यांनी केला आहे. या दोन्ही वानरांच्या स्मृतिप्रित्यार्थ हे रोप त्या ठिकाणी वाढविण्यात येणार आहे. तसेच तिथे समधीस्थळही करण्यात येणार आहे.

--------------

वन्यप्राण्यांच्या जीवाचे नाही मोल...

खराडीतील पुलावर हे वानर फिरत असताना वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. खरं म्हणजे धडक दिल्यानंतर तिथे थांबणे अपेक्षित होते. शहरातच जर वन्यजीवांची अशी अवस्था होत असेल, तर त्यांनी कोणाकडे दाद मागायची. याच ठिकाणी दोन माणसे असती, तर त्याचा मोठा ‘गवगवा’ झाला असता, पण वन्यजीव असेल तर त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही.