शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: March 25, 2017 03:42 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही.

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करूनदेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. विकत पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.तालुक्यातील माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क.प., रसाळवाडी, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी परिसरात याही वर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेतून पाणी चार-चार दिवस येत नाही. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावर जावे लागते. एकीकडे ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा तगाता लावला आहे. वर्षाकाठी १००० रुपये पाणीपट्टी आकारली जात असताना दररोज पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र, काऱ्हाटीसारख्या मोठ्या गावात जास्त लोकसंख्येच्या तुलनेत पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, सहा ते आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुन्हा विकत घेण्याची वेळ आली आहे. वाड्यावस्त्यांवरील बहुतांश भागातील विहिरींचा तळ उघडा पडला आहे. उपलब्ध पाणी क्षारयुक्त आहे.